शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

चाळीसगावला उन्नत ग्रामविकास अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 16:58 IST

तीन दिवस कार्यशाळा : आमदारांसह अधिकारी वर्गाने केले मार्गदर्शन

<p>चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील सर्व गावांतील समस्यांचा आढावा घेऊन सरपंच व सादस्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय उन्नत ग्रामविकास अभियान कार्यशाळा पार पडली. यानिमित्ताने लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यात उहापोह झाला. गावांचे विकासात्मक कृती आराखडे तयार करण्यात आले.दर दिवशी १२ तासांहून अधिक काळ ही कार्यशाळा चालली.या वेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याशी गावात आवश्यक विविध विकासकामांबाबत आमदार उन्मेष पाटील, पंचायत समिती सभापती, उपसभापती, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी चर्चात्मक संवाद साधला. अभियानात पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, वीज वितरणचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, गटशिक्षणाधिकारी, महिला बालविकास अधिकारी आदी ग्रामविकासाशी संबंधित सर्व विभाग सहभागी झाले होते.गावनिहाय समस्या व प्रश्नांच्या नोंदी घेण्यात आल्या. या वेळी आमदार उन्मेष पाटील यांनी गावगाड्याच्या कारभारात राजकारण न आणता विकासासाठी पुढे यावे. सर्वतोपरी मदत करू, असे आवाहन केले.अभियान कार्यशाळेमुळे तीन दिवस शासकीय विश्रामगृहाला यात्रेचे स्वरुप आले होते. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी असे अभियान राबविल्याबाबत समाधान व्यक्त केले.काय आहे अभियान?ग्रामविकासासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अनेक अडचणी येत असतात, अनेक विकासकामांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध असतानादेखील योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा न केल्यामुळे गावांना या कामांपासून वंचित राहावे लागते. प्रशासकीय स्तरावरदेखील काही अडचणी निर्माण झाल्यामुळे विकासकामांना खोळंबा येतो. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनाचा समन्वय व्हावा, येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. यासाठी अभियान ही संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सात गटनिहाय ही अभियान कार्यशाळा पार पडली.1. २४ रोजी करगाव- टाकळी प्रचा व दुपारी रांजणगाव- पाटणा, २५ रोजी बहाळ-कळमडू व दुपारी पातोंडा- वाघळी, २६ मेहुणाारे-दहिवद व उंबरखेड सायगाव, २७ रोजी देवळी- तळेगाव या जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले.