शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चाळीसगावला उन्नत ग्रामविकास अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 16:58 IST

तीन दिवस कार्यशाळा : आमदारांसह अधिकारी वर्गाने केले मार्गदर्शन

<p>चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील सर्व गावांतील समस्यांचा आढावा घेऊन सरपंच व सादस्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय उन्नत ग्रामविकास अभियान कार्यशाळा पार पडली. यानिमित्ताने लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यात उहापोह झाला. गावांचे विकासात्मक कृती आराखडे तयार करण्यात आले.दर दिवशी १२ तासांहून अधिक काळ ही कार्यशाळा चालली.या वेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याशी गावात आवश्यक विविध विकासकामांबाबत आमदार उन्मेष पाटील, पंचायत समिती सभापती, उपसभापती, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी चर्चात्मक संवाद साधला. अभियानात पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, वीज वितरणचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, गटशिक्षणाधिकारी, महिला बालविकास अधिकारी आदी ग्रामविकासाशी संबंधित सर्व विभाग सहभागी झाले होते.गावनिहाय समस्या व प्रश्नांच्या नोंदी घेण्यात आल्या. या वेळी आमदार उन्मेष पाटील यांनी गावगाड्याच्या कारभारात राजकारण न आणता विकासासाठी पुढे यावे. सर्वतोपरी मदत करू, असे आवाहन केले.अभियान कार्यशाळेमुळे तीन दिवस शासकीय विश्रामगृहाला यात्रेचे स्वरुप आले होते. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी असे अभियान राबविल्याबाबत समाधान व्यक्त केले.काय आहे अभियान?ग्रामविकासासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अनेक अडचणी येत असतात, अनेक विकासकामांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध असतानादेखील योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा न केल्यामुळे गावांना या कामांपासून वंचित राहावे लागते. प्रशासकीय स्तरावरदेखील काही अडचणी निर्माण झाल्यामुळे विकासकामांना खोळंबा येतो. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनाचा समन्वय व्हावा, येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. यासाठी अभियान ही संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सात गटनिहाय ही अभियान कार्यशाळा पार पडली.1. २४ रोजी करगाव- टाकळी प्रचा व दुपारी रांजणगाव- पाटणा, २५ रोजी बहाळ-कळमडू व दुपारी पातोंडा- वाघळी, २६ मेहुणाारे-दहिवद व उंबरखेड सायगाव, २७ रोजी देवळी- तळेगाव या जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले.