शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

खावटी कर्जासाठी आदिवासी समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:02 IST

अमळनेर : आदिवासी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. भूकबळी विविध कागदपत्रांअभावी सुविधांपासून मुकावे लागत आहे. यामुळे आर्थिक दुर्बलचेवर मात ...

अमळनेर : आदिवासी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. भूकबळी विविध कागदपत्रांअभावी सुविधांपासून मुकावे लागत आहे. यामुळे आर्थिक दुर्बलचेवर मात करण्यासाठी सरकारने समाजास खावटी कर्ज द्यावे, या मागणीसाठी विविध संघटनांतर्फे येथील प्रांत कचेरीवर ८ जुलैरोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. तसेच प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रिकामे ताट, वाटीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली, परंतु आजही आदिवासी समाज बेघर आहे. रेशन कार्ड, जातीचा दाखला याअभावी त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ घेता येत नाही. रोजगार नसल्यामुळे अनेक तरुणांवर भूकबळीची वेळ आली आहे. यामुळे खावटी कर्ज मिळावे अशी सरकारकडून समाजजाची अपेक्षा आहे. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी प्रांत कचेरीवर थाळीनाद मोर्चा ८ जुलै रोजी काढला. राजपुत्र एकलव्य सेना, आदिवासी एकता परिषद तसेच विविध संघटनांनी सुभाष चौकातून बसस्थानकमार्गे प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व एकलव्य सेनाप्रमुख राज साळवी, जिल्हाध्यक्ष गोविंदा माळी, राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, गावरान जागल्या संघटनेचे प्रा.विश्वास पाटील, आदिवासी एकता परिषदेचे आंनद पवार, प्रा.जयश्री साळुंखे, कॉ.लक्ष्मण शिंदे, कोळी महासंघाचे गोपीचंद निकम, रावसाहेब पवार यांनी केले. प्रांत कचेरीवर मोर्चा आल्यानंतर मोर्चाला बाहेर अडवण्यात आले प्रांताधिकारी यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, असा आग्रह मोर्चेकऱ्यांनी धरला. प्रांताधिकाºयांनी नायब तहसीलदार चौधरी, दिनेश सोनवणे यांना प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन स्वीकारण्यास बाहेर पाठवले. मात्र नंतर राज साळवी, अनिल पाटील यांनी कार्यालयात जाऊन काही महिला प्रतिनिधींसोबत ताट-वाटी देऊन निवेदन दिले. निवेदनात खावटी कर्ज वाटप करून ५ हजार रुपए मिळावेत, आदिवासींचे दाखले इतर कोणत्याही समाजाला देऊ नयेत, प्रकल्प कार्यालय अमळनेर येथे व्हावे, भूमिहीन आदिवासी कुटुंबांना १० एकर जमीन वाटप करण्यात यावी, बेघरांना जागा देण्यात यावी, आदिवासी कुटुंबांना दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार ५ लिटर दारू ठेवण्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करावी, स्थानिक पातळीवर मासेमारी करण्यासाठी तलाव, धरणांचा ताबा द्यावा, अतिक्रमित गायरान, गावठाण जमिनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमण पीकपेरे लावून नियमित करावे यासह अनेक मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळ प्रांताधिकाºयांसोबत चर्चा करीत असताना आदिवासी बांधवांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला. विविध घोषणा देऊन थाळीनाद करण्यात आले.