शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अबब! विनातिकीट, विनामास्कसह धूम्रपान करणाऱ्या ६९ हजार प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:50 IST

भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात विविध एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही कारवाई मोहीम राबविली.

- सचिन देव

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरही जनरल तिकीट वा मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यातच प्रवाशांना आरक्षित तिकीटही लवकर मिळत नसल्याने, प्रवाशांना नाइलाजास्तव विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारत, भुसावळ विभागात ६९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

यात विनातिकीट प्रवाशांसह विनामास्क, धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तसेच ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म न झाल्यावर अनेक प्रवासी (पेनल्टी) दंडासह तिकिटाची रक्कम भरून प्रवास करीत असतात. अशा प्रवाशांचादेखील या कारवाईत समावेश आहे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या कारवाईत प्रवाशांकडून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे पाच कोटींच्या घरात दंड वसूल केला असल्याचे सांगण्यात आले.

महिनाभरात ५ कोटींचा दंड वसूलभुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात विविध एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही कारवाई मोहीम राबविली. यात विनातिकीट प्रवाशांवर ३५० रुपये दंड, विनामास्क १०० रुपये, धूम्रपान करणाऱ्यांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. असा एकूण ६९ हजार २०० प्रवाशांकडून ५ कोटींच्या घरात दंड वसूल करण्यात आला आहे.

विनातिकीट ६९ हजार प्रवासी पकडलेरेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. तिकीट निरीक्षकांचे पथक भुसावळ विभागातून मुंबईला जाणाऱ्या-येणाऱ्या कुठल्याही गाडीत कारवाई मोहीम राबवित आहे. यामध्ये पूर्वीचे आरक्षित असलेले आणि कोरोनाकाळापासून जनरल केलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी विनातिकीट आढळून येत आहेत. अशा प्रकारे ६९ हजार २०० विनातिकीट प्रवासी पकडून रेल्वेतर्फे कारवाई करण्यात आली असल्याचे जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

कोरोनाकाळात सर्वाधिक फटकाकोरोनाकाळात नागरिकांना आरक्षणाशिवाय रेल्वेतून प्रवास करण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे तिकीट कन्फर्म न झालेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या प्रवाशांना नाइलाजाने विनातिकीट तर काही प्रवाशांनी पेनल्टी भरून प्रवास केला. त्यात तिकीट कन्फर्म नसल्यामुळे या प्रवाशांना जनरल बोगीतून उभे राहून प्रवास करावा लागला. एकंदरीत कोरोना काळात प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटक्यासह मानसिक त्रासही सहन करावा लागल्याचे दिसून आले.

टॅग्स :railwayरेल्वे