शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या तंबीनंतर रस्त्याच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:47 IST

जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती ...

जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती सुरु झाली आहे. गेले अनेक दिवस या महामार्गातील खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकरीचे झाले होते..राज्यभरात खड्ड्यांनी रस्ते वेढलेले असताना औरंगाबाद-जळगाव महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. या मार्गावरील वाहतूक ठप्प होईल की काय? अशी स्थिती होती. या दोन जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना जीव मुठीत धरून आणि एकदम हळू प्रवास होत होता.अनेकवेळा विनंती करूनही कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गडकरी यांनी २ नोव्हेंबरला औरंगाबाद-सिलोड-जळगाव या महामार्गाची पुढील ८ दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता, बांधकाम विभाग आणि रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला दिले होते. गडकरी यांच्या टिष्ट्वटला ४ हजार ६०० लोकांनी उत्तर दिले होते. त्यांच्या आदेशानंतर कामाला वेग आला असून याबाबत स्वत: नितीन गडकरी यांनी टिष्ट्वट करत माहिती दिली. सध्या महामार्ग दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे.महामार्गाचे तीन टप्प्यात४यापूर्वीच्या एजन्सीकडून काम रखडल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तीन एजन्सी नेमल्या असून या महामार्गाचे तीन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते सिलोड, सिलोड ते फर्दापूर आणि फर्दापूर ते जळगाव रोड अशा तीन विभागांचे काम तीन एजन्सीज्ना आॅक्टोबर महिन्यात देण्यात आले आहे.अर्धे राज्य खड्ड्यांनी बेजार असताना औरंगाबाद-जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची तर खड्ड्यांनी चाळण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी, पावसामुळे पाणी भरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तर या रस्त्यावर मोठमोठी तळी साचली होती. पाणी साचलेल्या तळ्यामुळे खड्डा किती खोल आहे, हेही दिसून येत नव्हते. २७ आॅक्टोबर रोजी तर हा महामार्ग जवळपास १.३० तास ठप्प होता. दोन्ही बाजूला सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.याच मार्गावर वाकोद-पाहूर दरम्यान काम थंडावलेले असल्याने २ नोव्हेंबर रोजी पावसामुळे एवढा चिखल रस्त्यावर आला होता की, एस. टी.ही या चिखलात फसून गेली होती. यावेळीही दीड तास वाहतुक बंद होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या.गडकरी यांनी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामात लक्ष घालून आदेश दिल्यानंतर आता नेटिझन्सनी टिष्ट्वटचा पाऊस पाडत राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती देत या रस्त्यांची कामेही त्वरित पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकJalgaonजळगाव