शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

गडकरींच्या तंबीनंतर रस्त्याच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:47 IST

जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती ...

जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती सुरु झाली आहे. गेले अनेक दिवस या महामार्गातील खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकरीचे झाले होते..राज्यभरात खड्ड्यांनी रस्ते वेढलेले असताना औरंगाबाद-जळगाव महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. या मार्गावरील वाहतूक ठप्प होईल की काय? अशी स्थिती होती. या दोन जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना जीव मुठीत धरून आणि एकदम हळू प्रवास होत होता.अनेकवेळा विनंती करूनही कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गडकरी यांनी २ नोव्हेंबरला औरंगाबाद-सिलोड-जळगाव या महामार्गाची पुढील ८ दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता, बांधकाम विभाग आणि रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला दिले होते. गडकरी यांच्या टिष्ट्वटला ४ हजार ६०० लोकांनी उत्तर दिले होते. त्यांच्या आदेशानंतर कामाला वेग आला असून याबाबत स्वत: नितीन गडकरी यांनी टिष्ट्वट करत माहिती दिली. सध्या महामार्ग दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे.महामार्गाचे तीन टप्प्यात४यापूर्वीच्या एजन्सीकडून काम रखडल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तीन एजन्सी नेमल्या असून या महामार्गाचे तीन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते सिलोड, सिलोड ते फर्दापूर आणि फर्दापूर ते जळगाव रोड अशा तीन विभागांचे काम तीन एजन्सीज्ना आॅक्टोबर महिन्यात देण्यात आले आहे.अर्धे राज्य खड्ड्यांनी बेजार असताना औरंगाबाद-जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची तर खड्ड्यांनी चाळण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी, पावसामुळे पाणी भरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तर या रस्त्यावर मोठमोठी तळी साचली होती. पाणी साचलेल्या तळ्यामुळे खड्डा किती खोल आहे, हेही दिसून येत नव्हते. २७ आॅक्टोबर रोजी तर हा महामार्ग जवळपास १.३० तास ठप्प होता. दोन्ही बाजूला सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.याच मार्गावर वाकोद-पाहूर दरम्यान काम थंडावलेले असल्याने २ नोव्हेंबर रोजी पावसामुळे एवढा चिखल रस्त्यावर आला होता की, एस. टी.ही या चिखलात फसून गेली होती. यावेळीही दीड तास वाहतुक बंद होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या.गडकरी यांनी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामात लक्ष घालून आदेश दिल्यानंतर आता नेटिझन्सनी टिष्ट्वटचा पाऊस पाडत राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती देत या रस्त्यांची कामेही त्वरित पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकJalgaonजळगाव