शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना विकसित करण्याची क्षमता शिक्षणात नाही - मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:41 IST

क्षमतेवर स्वारस्य मात करते तेव्हा नैराश्य

चुडामण बोरसेशिक्षण घेऊन मोठं झालो की, संवेदना विकसित करण्यासाठीचे प्रोग्राम जॉईन करावे लागतात. कारण आताची शिक्षणपध्दती संवेदना विकसित करणारी नाही, हे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रोटरी क्लबच्या कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या आगाशे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.तरूणांसाठी आपण अभियान राबवताय? नेमका काय उद्देश आहे?अभियानवगैरे म्हणण्याएवढं काही मोठं नाही. पण तरूणांमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. त्यासाठीच कार्यक्रम घेत फिरत आहे.जागृती अभियानासाठी सिनेमा हेच माध्यम का निवडलं?माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हे लक्षात आले की, सिनेमा हे एक असे सोपे माध्यम आहे की, ज्या माध्यमातून आपण आपले विचार लोकांच्या मनात उतरवू शकतो. पूर्वीच्या लोकांमध्ये संवेदना होती. आज ती पूर्णपणे हरवली आहे. कारण मानसिकता हा विषयच नष्ट झाला आहे. जीवशास्त्रातून पुढे आलेला कोणीही माणूस हा मानसिकता बघतच नाही केवळ इंद्रियेच पाहून निदान काढतो आणि मन हे काही इंद्रीय नाही. आपले शरीर हे कंटेनर आहे आणि मन हे ‘कन्टेन्ट’ आहे, म्हणजेच कंटेनरमधील साहित्य आहे.आताच्या तरूणांबद्दल काय सांगता येईल?तरूणपणात प्रत्येकाने अनेक विषय पाहिले पाहिजेत. त्यामुळेच कळते की, तुमची क्षमता काय आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीत जास्त स्वारस्य आहे? आपल्या क्षमतेवर जेव्हा स्वारस्य मात करते, तेव्हा माणूस नैराश्यग्रस्त होतो. नैराश्य हा आजार असा आहे की, कधी कधी ते लक्षातही येत नाही, त्यालाच मास्ट डिप्रेशन म्हणतात. या आजाराने अनेक तरूण पिडीत आहेत.चित्रपटनिर्मिती हा माझा छंद कधीच नव्हता. मला कलाकार म्हणून जगायचे आहे. पण कासव या चित्रपटाची कथा छान होती आणि यामध्ये माझा ‘रोल’ चांगला होता. म्हणून मी निर्माता होण्याचे ठरवले, एवढंच.नवीन चित्रपटाबद्दल काही...मला जीवनाचा दर्जा या विषयावर सिनेमा काढायचा आहे. स्वातंत्र्य हवे म्हणजे काय? लहानपणी आपण इतरांवर अवलंबून असतो. मोठे होतो पैसे कमावतो, स्वातंत्र्य होतो. स्वातंत्र्य झाल्यानंतर आईवडिलांची अडगळ वाटू लागते. त्यांना एखादी पॉश व्यवस्था करून देतो, पण आपल्यापासून दूर ठेवतो. अरे, पहिले बघा तर त्यांना ती पॉश व्यवस्था हवेय की तुम्ही...? नंतर आपणही म्हातारे होतो आणि पुन्हा पारतंत्र्यात जातो. हे कसलं आहे स्वातंत्र्य? याच विषयावर बेतलेला माझा सिनेमा आहे.तरूण ही या देशाची मोठी शक्ती आहे. या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर झाला तर देश कितीतरी पुढे जाईल. - मोहन आगाशे

टॅग्स :Jalgaonजळगाव