शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संवेदना विकसित करण्याची क्षमता शिक्षणात नाही - मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:41 IST

क्षमतेवर स्वारस्य मात करते तेव्हा नैराश्य

चुडामण बोरसेशिक्षण घेऊन मोठं झालो की, संवेदना विकसित करण्यासाठीचे प्रोग्राम जॉईन करावे लागतात. कारण आताची शिक्षणपध्दती संवेदना विकसित करणारी नाही, हे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रोटरी क्लबच्या कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या आगाशे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.तरूणांसाठी आपण अभियान राबवताय? नेमका काय उद्देश आहे?अभियानवगैरे म्हणण्याएवढं काही मोठं नाही. पण तरूणांमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. त्यासाठीच कार्यक्रम घेत फिरत आहे.जागृती अभियानासाठी सिनेमा हेच माध्यम का निवडलं?माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हे लक्षात आले की, सिनेमा हे एक असे सोपे माध्यम आहे की, ज्या माध्यमातून आपण आपले विचार लोकांच्या मनात उतरवू शकतो. पूर्वीच्या लोकांमध्ये संवेदना होती. आज ती पूर्णपणे हरवली आहे. कारण मानसिकता हा विषयच नष्ट झाला आहे. जीवशास्त्रातून पुढे आलेला कोणीही माणूस हा मानसिकता बघतच नाही केवळ इंद्रियेच पाहून निदान काढतो आणि मन हे काही इंद्रीय नाही. आपले शरीर हे कंटेनर आहे आणि मन हे ‘कन्टेन्ट’ आहे, म्हणजेच कंटेनरमधील साहित्य आहे.आताच्या तरूणांबद्दल काय सांगता येईल?तरूणपणात प्रत्येकाने अनेक विषय पाहिले पाहिजेत. त्यामुळेच कळते की, तुमची क्षमता काय आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीत जास्त स्वारस्य आहे? आपल्या क्षमतेवर जेव्हा स्वारस्य मात करते, तेव्हा माणूस नैराश्यग्रस्त होतो. नैराश्य हा आजार असा आहे की, कधी कधी ते लक्षातही येत नाही, त्यालाच मास्ट डिप्रेशन म्हणतात. या आजाराने अनेक तरूण पिडीत आहेत.चित्रपटनिर्मिती हा माझा छंद कधीच नव्हता. मला कलाकार म्हणून जगायचे आहे. पण कासव या चित्रपटाची कथा छान होती आणि यामध्ये माझा ‘रोल’ चांगला होता. म्हणून मी निर्माता होण्याचे ठरवले, एवढंच.नवीन चित्रपटाबद्दल काही...मला जीवनाचा दर्जा या विषयावर सिनेमा काढायचा आहे. स्वातंत्र्य हवे म्हणजे काय? लहानपणी आपण इतरांवर अवलंबून असतो. मोठे होतो पैसे कमावतो, स्वातंत्र्य होतो. स्वातंत्र्य झाल्यानंतर आईवडिलांची अडगळ वाटू लागते. त्यांना एखादी पॉश व्यवस्था करून देतो, पण आपल्यापासून दूर ठेवतो. अरे, पहिले बघा तर त्यांना ती पॉश व्यवस्था हवेय की तुम्ही...? नंतर आपणही म्हातारे होतो आणि पुन्हा पारतंत्र्यात जातो. हे कसलं आहे स्वातंत्र्य? याच विषयावर बेतलेला माझा सिनेमा आहे.तरूण ही या देशाची मोठी शक्ती आहे. या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर झाला तर देश कितीतरी पुढे जाईल. - मोहन आगाशे

टॅग्स :Jalgaonजळगाव