शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ने शिक्षकांना घाम फोडला, थोडक्यापायी नोकरी जायची वेळ आली..!

By अमित महाबळ | Updated: April 6, 2023 19:48 IST

थोडक्यापायी शिक्षकांची नोकरी गोत्यात आली आहे.

जळगाव : नव्याने अनुदानावर आलेल्या व टप्पावाढ मंजूर झालेल्या शाळांना ३० एप्रिलच्या आत संच मान्यता करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे पण त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्षातील स्थिती अशी आहे, की बऱ्याच शाळांचे अपडेशनचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे थोडक्यापायी शिक्षकांची नोकरी गोत्यात आली आहे.

नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संचमान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. यानुसारच अनुदान मिळणार आहे. मार्चअखेर १६९ शाळांना अनुदान मंजूर झाले, तर १४ ते १६ शाळांची पडताळणी बाकी आहे. मात्र, आधार आधारीत संच मान्यता केली नाही, तर निकषात बसत असूनही शाळांना अनुदानाला मुकावे लागणार आहे. आधार व्हॅलिडेट करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने ३० एप्रिलची शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर मुदतवाढीची शक्यता नाही. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १९ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे बाकी आहे. याचा फटका शिक्षक संघटनेच्या नेत्यांनाही बसला आहे. त्यांचे वेतन अनुदान प्रलंबित झाले आहे.

यूआयडीएआय पोर्टलकडून व्हॅलिडेशन

- जिल्ह्यात सहा हजार विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागातून मिळाली. ज्यांचे आधार आहेत, त्या आधारे स्टुडंट पोर्टलवर माहिती भरून तेथून व्हॅलिडेट करावे लागते. ही प्रक्रिया आधार (यूआयडीएआय) पोर्टलच्या माध्यमातून होते. यामध्ये एकेका विद्यार्थ्याला एक ते दीड तास वेळ लागत आहे.

आधार व्हॅलिडेट न झाल्यास....

- आधार व्हॅलिडेट न झाल्यास त्याचा परिणाम संच मान्यतेवर होणार आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाचे पद मंजूर आहे. या प्रमाणात जेवढे आधार इनव्हॅलिड होतील, तेवढ्यांच्या नोकऱ्या गोत्यात येण्याची शक्यता असल्याचे शिक्षक किशोर घुले यांनी सांगितले. 

संच मान्यता नसल्यास भरती रखडणार ?

संच मान्यता आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार केली जाणार आहे. मात्र, २०२१-२२ आणि २०२२-२३ वर्षातील काही शाळांच्या संच मान्यता अजूनही सिस्टीमध्ये आलेल्या नाहीत. नव्याने अनुदानावर आलेल्या, टप्पा वाढ झालेल्या शाळांना अनुदान सुरू करणे, शिक्षक भरती, रिक्त पदांची निश्चिती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन यासाठी संच मान्यता आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय समिती नेमावी. ज्या शाळांना नव्याने २० टक्के अनुदानाचे आदेश मिळाले आहेत तेथील शिक्षक अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न करावेत. शाळेत येऊन प्रत्यक्ष आधार पडताळणी करावी, शिक्षकांची समस्या सोडवावी.- किशोर घुले, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख, शाळा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डTeacherशिक्षकJalgaonजळगाव