शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दृष्टी संकटाने अंधारले तान्हुल्या ‘प्रणय’ला...‘लता’वेलीने फुलविले ‘भोई’ राजाच्या आयुष्याला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 16:32 IST

दीड महिन्यांच्या लेकराच्या डोळ्यात नियतीने पेरला अंधार...संकटापुढे दातृत्वाचा प्रकाशही ठरला आबदार नि रुबाबदार...

जळगाव : तशी प्रसृती होतीच मुदतपूर्व. तशातच तान्हुल्याचे रडबोल गुंजले. काहीसा आनंद दरवळला. तेच नियतीच्या डोळ्यांना खुपलं. त्याच्या नशिबी ‘श्वास’कोंडी आली. म्हणून कृत्रिम ऑक्सिजन पुरवावा लागला. त्याचीही बाधा झाली. ‘प्रणय’ झटके देत गेला. तशातच डोळ्यांना बाधा झाली आणि ‘प्रणय’च्या नवआयुष्यालाच अंधारपणाची किनार जुळण्याची भिती निर्माण झाली. तेव्हा शस्त्रक्रियेचा पर्याय उरला. तेव्हा ‘प्रणय’चे माय-बापही व्यथित झाले. तेव्हा तरारला दातृत्वाचा वेल...या वेलीने शस्त्रक्रियेचा आर्थिक भार पेलला आणि तान्हुल्या ‘प्रणय’च्या डोळ्यात प्रकाश पेरला.

वेदनांची आणि दु:खाची ही ‘प्रणय’व्यथा. ८ मार्चला मुदतपूर्व प्रसृतीने ‘प्रणय’ला आयुष्य वाहिले.जन्मताच त्याचे वजन पावणेदोन किलो. ‘प्रणय’ तसा कमी दिवसांचा आणि कमी वजनाचा. म्हणून त्याची श्वासकोंडी होत गेली.नवआयुष्यातही तो गुदमरत गेला. तेव्हा त्याला सलग १५ दिवस ऑक्सिजन पुरवावा लागला. या प्रवासातच ‘प्रणय’ला नियतीने हेरले.प्रणय झटके देत गेला.तेव्हा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणाही कौशल्यपणाला लावत गेले. श्वासकोंडीनंतर नियतीने ही बाधा प्रणयच्या डोळ्यापर्यंत नेली. तेव्हा वैद्यकीय यंत्रणाही हतबल झाली. ‘प्रणय’च्या डोळ्यातील पडद्यावर संकटांचे ढग पसरले. तेव्हा शस्त्रक्रियेशिवाय नाही, या निष्कर्षापर्यंत वैद्यकीय यंत्रणा पोहोचली. तेव्हा प्रणयची आई आणि वडील विक्की भोई व्यथीत झाले.

आर्थिक तरतुदीचे आभाळ त्यांच्यावर कोसळले. तेव्हा नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या मनीषा पाटील यांनी ‘प्रणय’ला हात दिला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.नीलिमा सेठिया यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा सेठियांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. तेव्हा लिनेस क्लबच्या लता बनवट यांनी या शस्त्रक्रियेचा भार उचलण्याची तयारी दाखविली. ‘प्रणय’ला गोदावरी रुग्णालयात हलविले. लता बनवटही सरसावल्या. तिथल्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वैशाली पाटील, डॉ.नारखेडेंची चर्चा झाली आणि तान्हुला प्रणय शस्त्रक्रियेला सामोरे गेला.काहीवेळाने ‘प्रणय’ परतला...अंधार दूर सारुन...आनंद विश्व डोळ्यात सामावून...

कमी वजनामुळे डोळ्यातील पडद्यावरच्या रक्तवाहिन्या विकसित होत नाहीत.त्यामुळे डोळ्यातील पडदा गोळा होता. त्यामुळे दृष्टी हरपण्याची शक्यता असते. प्रणयवर दोन टप्प्यात शस्त्रक्रिया होणार आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे संकट टळले आहे.-डॉ.अश्विनी पाटील-नेहते, रेटीना तज्ज्ञ, गोदावरी रुग्णालय.

प्रणयचे दु:ख वेचले गेले. खूप समाधानी आहे. आर्थिक भारापेक्षा सामाजिक जबाबदारी महत्वाची होती. म्हणूनच शस्त्रक्रियेसाठी माणसुकीचा हात दिला.-लता बनवट, लीनेस क्लब, जळग़ाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव