शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

दहावी प्रवेशाच्या दिवशीच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, समता नगरवासियांसाठी काळा दिवस

By सुनील पाटील | Updated: July 28, 2022 22:27 IST

मंगळवारी देखील रोहिदास भील उर्फ भगत (वय १७,रा.किनगाव, ता.यावल) या दहावीच्या विद्यार्थ्याचा ममुराबाद रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता.

- सुनील पाटील

जळगाव : समता नगरवासियांसाठी गुरुवार अर्थात दीप अमावस्या काळा दिवस ठरला. दहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर लगेच काही तासातच अमोल ज्ञानेश्वर भाले (वय १५) या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत भरत रमेश आंबेकर (वय ४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना तीन तासाच्या अंतरात घडल्या. मंगळवारी देखील रोहिदास भील उर्फ भगत (वय १७,रा.किनगाव, ता.यावल) या दहावीच्या विद्यार्थ्याचा ममुराबाद रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता.

अमोल भाले हा यंदा नववी पास झाला. गुरुवारी वडिलांनी त्याचा शाळेत दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यानंतर अमोल हा दुपारी गल्लीतील मुलांसोबत शिरसोली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेला. तेथे पोहत असताना तो पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत नव्हते, तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हा प्रकार सोबतच्या मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी समता नगरात संपर्क साधून माहिती कळविली. नातेवाईकांनी त्याला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अमोल याचे वडील कंत्राटी सफाई कामगार आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ कोमल असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडील बाहेर बसलेले होते, घरात मुलाने घेतला गळफाससमता नगरातील वंजारी टेकडी भागात गुरुवारी दुपारी भरत रमेश आंबेकर (वय ४०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा वडील बाहेर बसलेले होते तर पत्नी बाहेर गेलेली होती. मुले शाळेत होती. भरत यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही, परंतु आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपविल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात वडिल रमेश आंबेकर, पत्नी सविता, मुलगा कल्पेश व किरण असा परिवार आहे. महिनाभरात समता नगरातील ही चौथी घटना आहे. रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव