शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

तापी महामंडळाचे ३५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ हजार कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:47 IST

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून निधीची अपेक्षा

ठळक मुद्दे तापी महामंडळातर्फे प्रकल्पांवर झालेला खर्च-५६४० कोटी बजेट तरतुदीच्या जेमतेम मिळतो निधी- १०%शेळगाव बॅरेजसाठी आवश्यकता- ३५४ कोटी सुलवाडे बॅरजेसाठी आवश्यक निधी- २१०० कोटी पाडळसेर धरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक- २४००कोटी

सुशील देवकरजळगाव : तापी पाटबंधारे महामंडळातर्फे ३५ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून या प्रकल्पांवर आतापर्यंत ५६४० कोटी रूपये खर्च झाले आहेत. अद्यापही ९हजार १०० कोटींची आवश्यकता आहे. मात्र राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निधी दिला जात असल्याने तापी महामंडळाच्या वाट्याला दरवर्षी जलसंपदा खात्याच्या बजेटमधून जेमतेम ३५० ते ४०० कोटीच येत आहेत. प्रकल्पखर्चात सातत्याने वाढ होत असताना असाच तोकडा निधी मिळत राहिल्यास हे सर्व प्रकल्प १० वर्षातही पूर्ण करणे अशक्य होणार आहे.प्रकल्पांच्या वाढताय किंमतीतापी महामंडळाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार काम सुरू झालेले प्रकल्पच पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार ३५ प्रकल्पांचे काम जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकल्पांची अंदाजपत्रकीय किंमत सुमारे १५हजार ४६८ कोटी रूपये होती. मात्र मंडळाच्या स्थापनेपासून या प्रकल्पांवर सुमारे ५६४० कोटी रूपये खर्च होऊनही सातत्याने वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे या प्रकल्पांचे काम अपूर्णच आहे.निधी मिळतो तोकडाराज्याचे जलसंपदा विभागाचे बजेटच सुमारे ७ ते ८ हजार कोटींचे आहे. अनुशेषाच्या राज्यपालांच्या सुत्रानुसार या निधीचे वाटप केले जाते. त्यानुसार तापी महामंडळाला या बजेट तरतुदीच्या जेमतेम १० टक्केच निधी मिळतो. २०१७-१८ मध्ये ३१२ कोटींचा निधी तापी महामंडळाला मिळाला होता. तर २०१८-१९ मध्ये ४२२ कोटींचा निधी मिळाला आहे. यात अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारासह भूसंपादन, व प्रकल्पाच्या कामाचाही समावेश आहे. त्यामुळे तुकड्यातुकड्याने प्रकल्पांचे काम सुरू आहे. दरवर्षी जिल्हा दरसूची मात्र बदलत असून प्रकल्पांच्या किंमतीत १० टक्के वाढ होत आहे. म्हणजेच ९ हजार कोटींची कामे बाकी असल्यास १० टक्के किंमत वाढून त्यात ९०० कोटींच्या वाढीव किंमतीची भर पडत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना मोजक्याच टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून देण्याची गरज आहे.वित्तमंत्र्यांनी लक्ष घालावेराज्य शसनाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवित जलसंपदा विभागाची तरतूद (आऊट ले) वाढवून १५ हजार कोटींपर्यंत केल्यास राज्यपालांच्या सुत्रानुसार तापी महामंडळाच्या निधीत वाढ होऊन ८०० ते १००० कोटींचा निधी दरवर्षी मिळू शकेल. असे झाले तर उरलेली ४ हजार कोटींची कामे पाच वर्षात पूर्ण करणे सहज शक्य होऊ शकेल. वित्तमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.केंद्राच्या योजनांचा आधार1 तापी महामंडळासारखीच सर्वच महामंडळांची परिस्थिती असल्याने त्यांना प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्यासाठी केंद्राच्या योजनांवर अवलंबून रहावे लागत आहे. केंद्र शासनाच्या बळीराजा योजना व पंतप्रधान सिंचाई योजना या दोन योजनांमध्ये आपल्या प्रकल्पांचा समावेश कसा होईल, यासाठी सर्वच सिंचन महामंडळे प्रयत्नशील आहेत.2 राज्यभरातील सुमारे १३५०० कोटींच्या निधीची गरज असलेले ११२ प्रकल्प बळीराजा योजनेत तर २० हजार कोटींची गरज असलेले २६ प्रकल्प पंतप्रधान सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.3 बळीराजा योजनेत तापी महामंडळाने देखील शेळगाव बॅरेज, वरखेडे लोंढे व सुलवाडे जामफळ या तीन प्रकल्पांचा बळीराजा जलसिंचन योजनेत समावेश केला आहे.4 शेळगाव बॅरेज पूर्ण करण्यासाठी ३५४ कोटींची, वरखेडे लोंढेसाठी ४४६ कोटी तर सुलवाडेसाठी २१०० कोटींची अशी सुमारे ३ हजार कोटींच्या निधीची गरज आहे. ती तापी महामंडळाच्या तोकड्या निधीतून वर्षानुवर्ष भागविणे अशक्य आहे. मात्र बळीराजा योजनेत समावेश झाल्याने तीन वर्षात या प्रकल्पांना पुरेसा निधी मिळून हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.5 पाडळसरे प्रकल्पासाठी २४०० कोटींची गरज आहे. या प्रकल्पालाही नुकतीच केंद्रीय जलआयोगाची मंजुरी मिळाली असून त्यामुळे या प्रकल्पाचा केंद्राच्या बळीराजा योजनेत अथवा पंतप्रधान सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तापी महामंडळाच्या अपूर्ण प्रकल्पांसाठीच्या सुमारे ९ हजार कोटींच्या अपेक्षित रक्कमेपैकी सुमारे ५ हजार कोटींची कामे ही केंद्राच्या निधीतूनच करणे शक्य होणार आहे.