शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत या योजनेचे संपूर्ण कामदेखील पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी वाहून शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्याच्या सुमारे १० एकर जागेवर तयार होत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पात जाऊन त्या ठिकाणी या पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाचे कामदेखील ९० टक्के पूर्ण झाले असून, काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्णपणे तयार होऊन, या ठिकाणी शहरातील ४० लाख लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.

शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी या मलनिस्सारण प्रकल्पात जमा होणार आहे. या प्रकल्पात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ६० ते ६५ टक्के शुद्ध पाण्याचा वापर औद्याेगिक व कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. हे पाणी मनपा प्रशासनाकडून विक्री करून या पाण्याद्वारे मनपाला उत्पन्नदेखील मिळणार आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडे दीपनगर औष्णिक प्रकल्पासाठीदेखील या पाण्याच्या मागणीचा प्रस्तावदेखील मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. यावरदेखील मनपा प्रशासनाकडून विचार सुरू आहे. या प्रक्रिया झालेल्या पाण्यातूनदेखील मनपाला चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

मलनिस्सारण प्रकल्पाची माहिती

भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ८० टक्के

एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी

मुदत - सप्टेंबर २०२१

मक्तेदार - एल.सी. इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद

जलवाहिनी टाकण्याचे काम - २०३ किमीपैकी १५० किमी

-मलनिस्सारण प्रकल्पाला एकूण खर्च ४७ कोटी इतका अपेक्षित आहे

-या प्रकल्पाची एकूण क्षमता ४२ लाख लीटर इतकी आहे.

-शहरातील ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात होणार प्रक्रिया

-आतापर्यंत ९० टक्के काम झाले पूर्ण

-शिवाजीनगर भागातील जुन्या खत कारखान्याच्या जागेवर सुमारे १० एकराच्या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू

- दोन मोठ्या विहिरींमध्ये जमा होणार पाणी, चार केंद्रांमध्ये होणार प्रक्रिया

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, दुसरा टप्पा मात्र अधांतरीच

१. भुयारी गटार योजनेंतर्गत शहरासाठी पहिल्या टप्प्याची योजना मंजूर झाली होती. शहराच्या उर्वरित भागासाठीचे काम दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र, मनपाकडे दुसऱ्या टप्प्यासाठी करावयाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठीची जागा नाही.

२. त्यामुळे मनपा प्रशासनाने दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी शासनाकडे प्रस्तावदेखील पाठविलेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम संपण्यात आले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील काम अजून काही वर्षे होणे कठीण आहे.