शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुक्ताईनगर तालुक्यातील ८५१ शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:52 IST

८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील ८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, परंतु महावितरणकडून अद्याप कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा या वर्षाचाही रब्बी हंगामही हातून जाणार आहे.शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महावितरणकडे अर्ज करीत आहेत. अडीच वर्षांच्या काळात ८५१ शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. महावितरणकडून त्यांना डिमांड नोटही मिळाली. या शेतकऱ्यांनी डिमांड नोटचे पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या ८५१ शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. जेथे सोईस्कर राहील तेथे एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या एकाच रोहित्रावरून जोडणी दिली जाणार आहे. या सर्व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीकरिता सांबांधित मक्तेदारांना कामे देण्यात आली आहे. जवळपास सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत.८५१ शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजजोडणीसाठी मक्तेदारांना काम देण्यात आले आहे. जवळपास ९० टक्के ठिकाणावर कमी अधिक प्रमाणात खांब टाकणे, तारा ओढणे रोहित्र बसवणे अशी कामे सुरू आहेत.-ज्ञानेश्वर ढोले, उपकार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर