शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मुक्ताईनगर तालुक्यातील ८५१ शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:52 IST

८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील ८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, परंतु महावितरणकडून अद्याप कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा या वर्षाचाही रब्बी हंगामही हातून जाणार आहे.शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महावितरणकडे अर्ज करीत आहेत. अडीच वर्षांच्या काळात ८५१ शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. महावितरणकडून त्यांना डिमांड नोटही मिळाली. या शेतकऱ्यांनी डिमांड नोटचे पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या ८५१ शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. जेथे सोईस्कर राहील तेथे एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या एकाच रोहित्रावरून जोडणी दिली जाणार आहे. या सर्व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीकरिता सांबांधित मक्तेदारांना कामे देण्यात आली आहे. जवळपास सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत.८५१ शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजजोडणीसाठी मक्तेदारांना काम देण्यात आले आहे. जवळपास ९० टक्के ठिकाणावर कमी अधिक प्रमाणात खांब टाकणे, तारा ओढणे रोहित्र बसवणे अशी कामे सुरू आहेत.-ज्ञानेश्वर ढोले, उपकार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर