शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:38 IST

खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे.

ठळक मुद्देएक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी दिली होती १२ वीची परीक्षाजळगाव जिल्ह्यातील ४१ हजार २७९ विद्यार्थी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण१२ जून रोजी मिळणार महाविद्यालयात गुणपत्रक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे इयत्ता १२ वीचा निकाल बुधवार ३० रोजी घोषित करण्यात आला. खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे. नाशिक विभागातील ९८७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची २१८ केंद्रांवर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.नाशिक विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती.जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ७१ केंद्रांवर परीक्षाइयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ४९ हजार २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ४१ हजार २७९ या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.धुळे व नंदुरबारची आघाडीधुळे जिल्ह्यातील १९७ महाविद्यालयातील २४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २१ हजार ९८० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १११ महाविद्यालयातील १६ हजार २३१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातील १३ हजार ७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धुळे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८८.८७ तर नंदुरबार जिल्ह्याची ८४.७० टक्के आहे.नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्केइयत्ता १२ वी परीक्षेसाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एक लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ८६.१३ टक्के आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव