शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘गिरणा’ ८२ टक्क्यांवर, ‘बोरी’चे सात दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:49 IST

धरण साठ्यांमध्ये वाढ

जळगाव : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यात गिरणा धरणाच्या साठ्यातही वाढ होऊन धरणसाठा ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे. बोरी धरणातही ९८.६४ टक्के पाणीसाठी झाला असून धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. तसेच वाघूर धरणही शंभर टक्क्यांवर कायम असून हतनूर धरण ७३.०२ टक्क्यांवर पोहचले असून धरणाचे चार दरवाजे उघडे आहेत.गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस होत असल्याने जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच धरण साठा शुुक्रवार, ४ सप्टेंबर रोजीच १०० टक्के भरले.बोरी धरणाचे सात दरवाजे उघडेपारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने या धरणाचे पाच दरवाजे शनिवारी रात्री १० वाजता पाच दरवाजे ०.१५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता एकूण सात दरवाजे ०.१५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून तीन हजार १५८ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाची पाणी पातळी सध्या २६७.१५ मीटरवर आहे.गिरणा धरणात आवक सुरू असल्याने धरण साठा ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे. ६ जुलै रोजी धरणात ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी हा साठा ४५.६३ टक्के झाला होता. २१ रोजी हा साठा ६०.३६ झाला व आता दोन दिवसात त्यात पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन हा साठा २३ आॅगस्ट रोजी ६३.६६ टक्के झाला. त्यानंतर २६ रोजी धरणसाठा ६९.३८ टक्के झाला. वाढ सुरूच राहून ३० आॅगस्ट रोजी हा साठा ७८.५८ टक्के झाला. त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी धरणसाठा ८०.२५ टक्के झाला. ६ सप्टेंबर रोजी ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे.वाघूर धरणात सध्या आवक सुरू असली तरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने सध्या साठा १०० टक्क्यांवर कायम आहे. ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो १४ आॅगस्ट रोजी ८९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर आता आठवडानंतर पुन्हा चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन रविवार, २३ आॅगस्ट रोजी धरण साठा आता ९३.०१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी ९५.८१ टक्के साठा झाला होता. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी हा साठा ९९.३० टक्के झाला. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी धरण १०० टक्के भरले.हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाचे ४ दरवाजे दीड मीटरने उघडे असून धरणातून १५ हजार ८२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ७३.०२ टक्के साठा आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव