शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जळगाव जिल्ह्यात ७१ हजार शौचालयांचे काम बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:56 IST

८५ टक्के काम पूर्ण

ठळक मुद्देदोन महिन्यात उद्दीष्टपूर्ती जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिह्यातील नऊ तालुक्यांमध्ये हगणदारीमुक्तची ८५ टक्के काम पूर्ण झाले असून अर्ध्याहून अधिक मार्च महिना उलटला तरी ७१ हजार वैयक्तिक शौचालयांची कामे बाकी आहे. येत्या दोन महिन्यात जिह्यातील कामे पूर्ण होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली.शासनाच्यावतीने राज्यभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीच्या कामांना गती देण्यात येत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हागणदारी मुक्ती जाहीर करण्यात आली आहे, मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कामे अद्याप अपूर्ण आहेत अशा जिल्ह्यांचा शासनातर्फे आढावा घेतला जात आहे. यासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग उपसंचालक रुचेष जयवंशी यांनी गेल्या आठड्यात जिल्हा परिषदेत येऊन कामकाजाचा आढावा घेतला असता जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्ह्यात त्यामुळे उर्वरित सर्व कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.जिल्ह्यात जळगाव, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल या नऊ तालुक्यात शौचालयांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. उपसंचालकांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावात स्थानिक अधिकारी नेमून कामांना गती देण्यात आली असली तरी ही कामे मार्च अखेर पूर्ण होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात हगणदारीमुक्तीसाठी एकूण २ लाख ४ हजार २९१ वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ठ देण्यात आले होते, त्यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. तर ७१ हजार १०२ कामे बाकी आहेत. यासाठी वर्षभरात ५३ कोटी ७३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. यात ८२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान देणे बाकी आहे. तर उर्वरित कामांसाठी पुन्हा ९७ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.धरणगाव - ९५२४, भडगाव ९५०७, भुसावळ - २४, बोदवड - २९६८, एरंडोल - ८१४४, मुक्ताईनगर - ६७०८, रावेर - १०६६०, जळगाव - ९७७९, पारोळा - ७२०२, यावल - ८१३३, अमळनेर - १००३४, चोपडा- ८६९४, चाळीसगाव - ११४०७, पाचोरा - १०३६४, जामनेर - १०८४३ असे एकूण १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. यात धरणगाव, भडगाव, भुसावळ, बोदवड, एरंडोल, मुक्ताईनगर हे सहा तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद