शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथील  ७०० घरांचे अतिक्रमण जमिनदोस्त..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:13 IST

भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील सुमारे ७०० घरांचे अतिक्रमण गुरूवारी जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी हजाराच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रारंभी थोडाशा विरोधानंतर अतिक्रमण हटाव शांंततेत पार पडले.

ठळक मुद्देनागरिकांनी स्वत:हून काढली अतिक्रमणेलोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजी व्यक्त

भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील आरपीडी रोडवरील हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ, आणि आगवाली चाळीतील पहिल्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी हजारपेक्षाही जास्त पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, शुक्रवारी देखील मोहीम राबविली जाणार आहे.गुरूवारी सकाळी ६: १४ वाजता डिझेल लोको शेडला चार जेसीबी पाठविण्यात आले. अतिक्रमण हटविण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघून नागरिकांनी स्वत:हून घरातील सामान काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना कोणतीही जबरदस्ती करावी लागली नाही. घरे खाली झाल्यानंतर १२ जेसीबीद्वारे पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुमारे ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आली. हा परिसर एखाद्या भूकंप आल्यानंतरच्या परिस्थितीसारखा दिसत होता.रस्ता बंदअतिक्रमणातील हद्दीमध्ये सकाळी डीआरएम चौक, रेल्वे हॉस्पिटल, दुर्गामाता मंदिराजवळ, कृष्णचंद्र सभागृह या ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात रस्ते बंद करण्यात आले होते. महत्त्वाच्या कामासाठी व अधिकारी यांनाच आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला जात होता.पल पल की खबर पर नजरडीआरएम आर. के. यादव, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, एडीआरएम मनोज सिन्हा, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, यांच्यासह रेल्वेच्या ७० अधिकारी क्षणाक्षणाच्या खबरवर नजर ठेवून होते.एकाही घरात चूल पेटली नाही१४ रोजी संध्याकाळी पोलिसांच्या रूट मार्चनंतर अनेकांच्या हृदयात धडकी भरली, कोणत्याही परिस्थितीत घर सोडावे लागणार यामुळे नागरिकांनी रात्रभर जागरण करून संसाराचे सर्व साहित्य जुळवाजुळव करून भाड्याचे घर शोधून स्थलांतर केले. अनेकांना घरेच मिळाली नाही. त्यांनी त्याच स्थितीमध्ये सामान रस्त्यावरच ठेवले. या धावपळीत एकाच्याही घरात चूल पेटली नाही. तशात साहित्य वाहण्यासाठी वाहनही मिळेना.एकाच वेळी दोन हजार पेक्षा जास्त घरे असलेल्या वस्तीतील लोकांनी घरे सोडल्यानंतर इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी शहरातील सर्व भाड्याची वाहने बुक झाली होती अनेकांना वाहने मिळाली नसल्यामुळे त्यांचे साहित्य रस्त्यावर पडून होते. वाहने मिळालेल्याचे ताफे शहरातून स्थलांतर होतांना दिसत होते.भूकंपासारखी स्थितीएकाच वेळी अनेक घरे तोडली गेल्याने पूर्ण परिसरमध्ये ढिगारे व अवशेष दिसत होते. भूकंप आल्यासारखी स्थिती येथे जाणवत होती.तीन तासातच सामान्य स्थितीशहर वाहतूक शाखेने अतिक्रमण काढण्याच्यावेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. तसेच दोन दिवसाकरीता मार्ग बंद असल्याचे फलक लावले होते परंतु तीनच तासात सामान्य स्थिती झाल्यानंतर नागरिक ये- जा करीत होते.लोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजीशेकडो नागरिक बेघर होत असताना लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून काहीतरी तोडगा काढतील याची नागरिकांना अपेक्षा होती. परंतु खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे दोन्हीही याठिकाणी आले नाहीत. आम्हाला साधा दिलासा सुद्धा दिला नाही. आम्ही कुठे जावे ? कोणाकडे फिर्याद द्यावी? हेच का ते अच्छे दिन...? सबका साथ सबका विकास म्हणणारे कुठे गेले... पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देणार होते, रोजगार देणार होते हे फक्त जुमलेच राहिले. उलट होते ते आमचे घर, रोजगार त्यांनी हिसकावून घेतले. अशा हृदय हेलावणाऱ्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या. एकता तायडे या गृहिणीने खासदार रक्षा खडसे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की, माझे मोठे बाबा वारले आहेत आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर समाजसेविका पुष्पा सोनवणे यांनी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, रमेश मकासरे यांना खडे बोल सुनावले व त्यांच्यासमोर बांगड्या फेकल्या. फक्त गुफ्तगू करा ..... व नेत्यांच्याच मागे फिरा असा वाद या वेळी झाला . 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण