शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथील  ७०० घरांचे अतिक्रमण जमिनदोस्त..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:13 IST

भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील सुमारे ७०० घरांचे अतिक्रमण गुरूवारी जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी हजाराच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रारंभी थोडाशा विरोधानंतर अतिक्रमण हटाव शांंततेत पार पडले.

ठळक मुद्देनागरिकांनी स्वत:हून काढली अतिक्रमणेलोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजी व्यक्त

भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील आरपीडी रोडवरील हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ, आणि आगवाली चाळीतील पहिल्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी हजारपेक्षाही जास्त पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, शुक्रवारी देखील मोहीम राबविली जाणार आहे.गुरूवारी सकाळी ६: १४ वाजता डिझेल लोको शेडला चार जेसीबी पाठविण्यात आले. अतिक्रमण हटविण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघून नागरिकांनी स्वत:हून घरातील सामान काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना कोणतीही जबरदस्ती करावी लागली नाही. घरे खाली झाल्यानंतर १२ जेसीबीद्वारे पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुमारे ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आली. हा परिसर एखाद्या भूकंप आल्यानंतरच्या परिस्थितीसारखा दिसत होता.रस्ता बंदअतिक्रमणातील हद्दीमध्ये सकाळी डीआरएम चौक, रेल्वे हॉस्पिटल, दुर्गामाता मंदिराजवळ, कृष्णचंद्र सभागृह या ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात रस्ते बंद करण्यात आले होते. महत्त्वाच्या कामासाठी व अधिकारी यांनाच आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला जात होता.पल पल की खबर पर नजरडीआरएम आर. के. यादव, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, एडीआरएम मनोज सिन्हा, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, यांच्यासह रेल्वेच्या ७० अधिकारी क्षणाक्षणाच्या खबरवर नजर ठेवून होते.एकाही घरात चूल पेटली नाही१४ रोजी संध्याकाळी पोलिसांच्या रूट मार्चनंतर अनेकांच्या हृदयात धडकी भरली, कोणत्याही परिस्थितीत घर सोडावे लागणार यामुळे नागरिकांनी रात्रभर जागरण करून संसाराचे सर्व साहित्य जुळवाजुळव करून भाड्याचे घर शोधून स्थलांतर केले. अनेकांना घरेच मिळाली नाही. त्यांनी त्याच स्थितीमध्ये सामान रस्त्यावरच ठेवले. या धावपळीत एकाच्याही घरात चूल पेटली नाही. तशात साहित्य वाहण्यासाठी वाहनही मिळेना.एकाच वेळी दोन हजार पेक्षा जास्त घरे असलेल्या वस्तीतील लोकांनी घरे सोडल्यानंतर इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी शहरातील सर्व भाड्याची वाहने बुक झाली होती अनेकांना वाहने मिळाली नसल्यामुळे त्यांचे साहित्य रस्त्यावर पडून होते. वाहने मिळालेल्याचे ताफे शहरातून स्थलांतर होतांना दिसत होते.भूकंपासारखी स्थितीएकाच वेळी अनेक घरे तोडली गेल्याने पूर्ण परिसरमध्ये ढिगारे व अवशेष दिसत होते. भूकंप आल्यासारखी स्थिती येथे जाणवत होती.तीन तासातच सामान्य स्थितीशहर वाहतूक शाखेने अतिक्रमण काढण्याच्यावेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. तसेच दोन दिवसाकरीता मार्ग बंद असल्याचे फलक लावले होते परंतु तीनच तासात सामान्य स्थिती झाल्यानंतर नागरिक ये- जा करीत होते.लोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजीशेकडो नागरिक बेघर होत असताना लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून काहीतरी तोडगा काढतील याची नागरिकांना अपेक्षा होती. परंतु खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे दोन्हीही याठिकाणी आले नाहीत. आम्हाला साधा दिलासा सुद्धा दिला नाही. आम्ही कुठे जावे ? कोणाकडे फिर्याद द्यावी? हेच का ते अच्छे दिन...? सबका साथ सबका विकास म्हणणारे कुठे गेले... पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देणार होते, रोजगार देणार होते हे फक्त जुमलेच राहिले. उलट होते ते आमचे घर, रोजगार त्यांनी हिसकावून घेतले. अशा हृदय हेलावणाऱ्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या. एकता तायडे या गृहिणीने खासदार रक्षा खडसे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की, माझे मोठे बाबा वारले आहेत आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर समाजसेविका पुष्पा सोनवणे यांनी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, रमेश मकासरे यांना खडे बोल सुनावले व त्यांच्यासमोर बांगड्या फेकल्या. फक्त गुफ्तगू करा ..... व नेत्यांच्याच मागे फिरा असा वाद या वेळी झाला . 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण