शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई

By विजय.सैतवाल | Updated: October 15, 2023 16:23 IST

स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आरएल समूहाने घेतलेले कर्ज थकल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या समूहाच्या ठिकठिकाणच्या ३१५.६० कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती ईडीने १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसून या विषयी माहिती घेत वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे आर. एल. समूहाचे संचालक मनीष जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यात ऑगस्ट महिन्यात ‘ईडी’ ने आर. एल. समूहाच्या सर्व आस्थापनांवर छापे टाकून तपासणी केली होती. तपासणी केल्यानंतर ईडी पथकांनी जळगावातील आर. एल. ज्वेलर्सच्या शोरूममधील रोख रक्कम जप्त करण्यासह शोरुममधील सोन्याचा स्टॉकदेखील सील केला होता.

दोन महिन्यांनंतर पुन्हा जप्तीची कारवाईऑगस्ट महिन्याच्या कारवाईनंतर ईडीने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुन्हा जप्तीची कारवाई केली. त्याविषयी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात ईडीने म्हटले आहे की, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छ आणि इतर ठिकाणी ७० स्थावर मालमत्ता, पवनचक्क्या, चांदी, हिऱ्यांचे दागिने सारख्या चल आणि अचल मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. यात राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर. एल. गोल्ड व मानराज ज्वेलर्स, प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन आणि इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. सीबीआयने भादंविच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या तीन एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला असून कंपन्या आणि त्यांचे संचालक, प्रवर्तक हे गुन्हेगारी कटाच्या गुन्ह्यांमध्ये अडकले.

षडयंत्र, फसवणूक, खोटेपणा आणि गुन्हेगारी वर्तन अशा चुकीच्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला ३५२.४९ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे ईडीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अशी कर्जे मिळवण्यासाठी प्रवर्तकांनी बनावट आर्थिक माहिती सादर केल्याचे तपासात उघड झाले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी, ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ अधिकृत आणि निवासी परिसरात शोधमोहीम राबवली होती आणि सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते.

वकिलांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊईडीने कोणत्या प्रकरणात कारवाई केली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. या विषयी माहिती घेत वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास आहे.- मनीष जैन, संचालक, आर. एल. समूह.

टॅग्स :JalgaonजळगावEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय