शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:27 IST

कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे.

ठळक मुद्देसततच्या मुसळधार पावसाने खरिपातील उभ्या ज्वारी व कापसाची धुळघाणज्वारी काळी होऊन, तर पांढऱ्या सोन्याच्या निम्मे कैºया सडून उत्पन्नात घट, शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल

किरण चौधरीरावेर : कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. तथापि, गत चार-पाच दिवसांपासून सातत्याने कुठे अर्धा तास, कुठे पाऊण तास तर कुठे तासभर कोसळधाºया पावसाने आता खरिपातील उभ्या कापसाच्या पिकाच्या निम्मे कैºया सडून काळ्या पडल्याने तर फुललेल्या बोंडातील कापूस ओला होऊन मातीमोल होत असल्याने तथा उभ्या ज्वारी पिकांची कणसे काळी पडून ऐन तोंडी आलेला उत्पन्नाचा घास वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. बुधवारीही तालुक्यात दुपारी तासभर व सायंकाळीही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.रावेर तालुक्यात जूनच्या आरंभी तीन टप्प्यात झालेल्या वादळी पावसाने ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३७ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा शासन दरबारी नुकसानीचे पंचनामेही सादर करण्यात आले. किंबहुना, केळी फळपीक विमा कंपन्यांनी स्वतंत्र पंचनामे करून लाल फितीत बंदिस्त केले आहेत.दरम्यान, खरिपाच्या उडीद व मूग पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उडीद, मूगाच्या हंगामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अपवादात्मक परिस्थितीत उडीद, मूगाचे आलेले चांगले उत्पादनही पावसात भिजल्याने हातचे गेल्याची शोकांतिका आहे. खरीप हंगामाची बोहणीच भोपळ्याने झाल्याने नेत्रसुखद असलेल्या खरिपातील कापूस, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन व तीळ पिकांना काळाची दृष्ट लागली.दरम्यान, कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील तीन हजार हेक्टरमधील केळी बाधित होऊन ६० कोटी ५५ लाख रुपयांचे तर नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्यापासून ते तापी काठापर्यंत ३८ गावातील १ हजार १२५. ८७ हेक्टरमधील केळीबागा, ज्वारी, मका तूर व कापसाचे पीक जमीनदोस्त होऊन अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. एकंदरीत, ६३ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न निकाली निघत नाही तोच गत पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून काही भागात अर्धा तास, काही भागात पाऊण तास तर काही भागात तासन् तास होत असलेल्या कोसळधार पावसाने आता उभ्या खरिपाचीही धुळघाण होऊन गंभीर वाताहत सुरू झाली आहे.तालुक्यात सरासरी ६५०.४३ मि.मी. अर्थात ९७.३६ टक्के पाऊस झाला असला तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन कापणी व मळणीच्या प्रतीक्षेत असलेले ज्वारीचे कणसं काळी पडून ज्वारी रंगहीन व बुरशीने कुजून वजनाने हलकी होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे ज्वारीचचया उत्पन्नाचा ऐन तोंडी येणारा घास वाया जाण्याची शक्यता आहे. किंबहुना, खरीपपूर्व लागवडीखालील आघात कापसाच्या वेचणीच्या प्रतीक्षेत बोंडावर फुललेला कापूस सततच्या पावसामुळे ओला होऊन खाली पडून मातीमोल होत आहे. किंबहुना परिपक्व झालेल्या कापसाच्या झाडावरील निम्म्यापेक्षा जास्त कैºया काळ्या पडून सडत आहेत. त्यामुळे केळी बागायतीत व खरीप उत्पादनात उत्पन्नाची आशा कमालीची धुसर झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर