शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:27 IST

कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे.

ठळक मुद्देसततच्या मुसळधार पावसाने खरिपातील उभ्या ज्वारी व कापसाची धुळघाणज्वारी काळी होऊन, तर पांढऱ्या सोन्याच्या निम्मे कैºया सडून उत्पन्नात घट, शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल

किरण चौधरीरावेर : कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. तथापि, गत चार-पाच दिवसांपासून सातत्याने कुठे अर्धा तास, कुठे पाऊण तास तर कुठे तासभर कोसळधाºया पावसाने आता खरिपातील उभ्या कापसाच्या पिकाच्या निम्मे कैºया सडून काळ्या पडल्याने तर फुललेल्या बोंडातील कापूस ओला होऊन मातीमोल होत असल्याने तथा उभ्या ज्वारी पिकांची कणसे काळी पडून ऐन तोंडी आलेला उत्पन्नाचा घास वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. बुधवारीही तालुक्यात दुपारी तासभर व सायंकाळीही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.रावेर तालुक्यात जूनच्या आरंभी तीन टप्प्यात झालेल्या वादळी पावसाने ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३७ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा शासन दरबारी नुकसानीचे पंचनामेही सादर करण्यात आले. किंबहुना, केळी फळपीक विमा कंपन्यांनी स्वतंत्र पंचनामे करून लाल फितीत बंदिस्त केले आहेत.दरम्यान, खरिपाच्या उडीद व मूग पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उडीद, मूगाच्या हंगामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अपवादात्मक परिस्थितीत उडीद, मूगाचे आलेले चांगले उत्पादनही पावसात भिजल्याने हातचे गेल्याची शोकांतिका आहे. खरीप हंगामाची बोहणीच भोपळ्याने झाल्याने नेत्रसुखद असलेल्या खरिपातील कापूस, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन व तीळ पिकांना काळाची दृष्ट लागली.दरम्यान, कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील तीन हजार हेक्टरमधील केळी बाधित होऊन ६० कोटी ५५ लाख रुपयांचे तर नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्यापासून ते तापी काठापर्यंत ३८ गावातील १ हजार १२५. ८७ हेक्टरमधील केळीबागा, ज्वारी, मका तूर व कापसाचे पीक जमीनदोस्त होऊन अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. एकंदरीत, ६३ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न निकाली निघत नाही तोच गत पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून काही भागात अर्धा तास, काही भागात पाऊण तास तर काही भागात तासन् तास होत असलेल्या कोसळधार पावसाने आता उभ्या खरिपाचीही धुळघाण होऊन गंभीर वाताहत सुरू झाली आहे.तालुक्यात सरासरी ६५०.४३ मि.मी. अर्थात ९७.३६ टक्के पाऊस झाला असला तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन कापणी व मळणीच्या प्रतीक्षेत असलेले ज्वारीचे कणसं काळी पडून ज्वारी रंगहीन व बुरशीने कुजून वजनाने हलकी होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे ज्वारीचचया उत्पन्नाचा ऐन तोंडी येणारा घास वाया जाण्याची शक्यता आहे. किंबहुना, खरीपपूर्व लागवडीखालील आघात कापसाच्या वेचणीच्या प्रतीक्षेत बोंडावर फुललेला कापूस सततच्या पावसामुळे ओला होऊन खाली पडून मातीमोल होत आहे. किंबहुना परिपक्व झालेल्या कापसाच्या झाडावरील निम्म्यापेक्षा जास्त कैºया काळ्या पडून सडत आहेत. त्यामुळे केळी बागायतीत व खरीप उत्पादनात उत्पन्नाची आशा कमालीची धुसर झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर