शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:52 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या एकूण ६२ हजार ९५३ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे़ दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात शंका असल्याचे त्याचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले़ परिणामी, अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व बंद करण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुध्दा बंद होती़ तर महाविद्यालयीन परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली होती़ दरम्यान, नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने आॅगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि सप्टेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सांगितले आहे़ त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वेळापत्रक निश्चितीसाठी त्याच बरोबर परीक्षांच्या नियोजना संदर्भात रोज बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाचीही स्थापना केली आहे़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जुलै महिन्यात घेण्यात येणार परीक्षांना अंतिम वर्षातील ६२ हजार ९५३ विद्यार्थी बसतील़ त्यात ३९ हजार ८५० विद्यार्थी तृतीय वर्षाती प्रवेशित नवीन विद्यार्थी तर २३ हजार १०३ रिपीटर विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ तसेच एकूण संख्येत तीन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे ३९ हजार ४९७ तर दोन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे १६ हजार ४८७ तसेच चार ते पाच वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ६ हजार ९६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे़एकूण २५० परीक्षा होणारपूर्वीच्या नियोजनानुसार ८५० परीक्षा घेतल्या जाणार होत्या़ मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता अंतिम वर्षाच्रूा एकूण २५० च्यावर परीक्षा होणार आहेत़ तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जाणार आहे़ त्याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात येणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव