शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:52 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या एकूण ६२ हजार ९५३ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे़ दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात शंका असल्याचे त्याचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले़ परिणामी, अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व बंद करण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुध्दा बंद होती़ तर महाविद्यालयीन परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली होती़ दरम्यान, नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने आॅगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि सप्टेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सांगितले आहे़ त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वेळापत्रक निश्चितीसाठी त्याच बरोबर परीक्षांच्या नियोजना संदर्भात रोज बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाचीही स्थापना केली आहे़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जुलै महिन्यात घेण्यात येणार परीक्षांना अंतिम वर्षातील ६२ हजार ९५३ विद्यार्थी बसतील़ त्यात ३९ हजार ८५० विद्यार्थी तृतीय वर्षाती प्रवेशित नवीन विद्यार्थी तर २३ हजार १०३ रिपीटर विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ तसेच एकूण संख्येत तीन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे ३९ हजार ४९७ तर दोन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे १६ हजार ४८७ तसेच चार ते पाच वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ६ हजार ९६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे़एकूण २५० परीक्षा होणारपूर्वीच्या नियोजनानुसार ८५० परीक्षा घेतल्या जाणार होत्या़ मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता अंतिम वर्षाच्रूा एकूण २५० च्यावर परीक्षा होणार आहेत़ तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जाणार आहे़ त्याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात येणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव