शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण? दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच लोकमत न्यूज नेटवर्क ...

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकाला नोटीस बजावण्यात येते. मात्र त्यापलीकडे महापालिका प्रशासनाकडून इतर कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती असून, यामध्ये तब्बल ६००हून अधिक नागरिक राहत आहेत. पावसाळ्यात दुर्दैवाने काही घटना घडल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

या इमारतींमध्ये राहण्याची इच्छा येथील रहिवाशांची नसली तरी पर्याय नसल्याने या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची खंत या इमारतीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच या ठिकाणी एक-एक रात्र काढावी लागते. मरण्याची हौस नसली तरी पर्याय नसल्यामुळे याठिकाणी दिवस काढावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मनपाकडून दरवर्षी नोटिसांचा सोपस्कार पार पाडला जातो, घरमालकांना इशारे दिले जातात, मात्र कारवाई कोणतीही होत नाही. घरमालक इमारतींची दुरुस्तीदेखील करत नाहीत अन् मनपा प्रशासनाकडून त्या घरमालकांवर कोणतीही कारवाईदेखील केली जात नाही. या परिस्थितीमुळे मात्र या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा पावसाळ्यातील प्रत्येक रात्र जीव मुठीत घेऊन काढावी लागत असते. जळगाव शहरात इमारत कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सारे कळते मात्र कुठे जाणार?

आम्ही राहत असलेली इमारत धोकेदायक असली तरी इतर कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर किरकोळ दुरुस्ती करून या इमारतींमध्ये दिवस काढावे लागत आहे.

- रघुनाथ सोनवणे, रहिवासी

इमारत धोकेदायक असल्याने या ठिकाणी पावसाळ्यातील कमीत कमी दिवस राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच दरवर्षी किरकोळ दुरुस्ती करून, पावसाळ्याच्या हंगाम संपण्याची वाट पाहत असतो.

-कमलबाई माळी, रहिवासी

जळगाव शहरात घरभाडे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महागाईच्या काळात मिळेल त्या घरात काही काळ वास्तव्य करावे लागले तरी, ते काढण्याचे प्रयत्न असतात. इमारत कोसळण्याची भीती तर असतेच, मात्र पर्याय तरी आमच्याकडे काय आहेत.

- लादू सुरवाडे, रहिवासी

वारंवार दिल्या नोटिसा

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा दिल्या जातात. त्यांना घर सोडण्याची किंवा घराची दुरुस्ती करण्यासंदर्भात सांगितले जात असते. मात्र दरवर्षी अनेक घरमालक इमारतीची किरकोळ दुरुस्ती करून वेळ मारून नेतात, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती आहेत.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

शहरातील धोकेदायक इमारतींमध्ये बहुतांश रहिवासी हे भाडेधारक आहेत. मनपा प्रशासनाकडून या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची जबाबदारी पार पाडली जाते तर इमारत मालकदेखील किरकोळ दुरुस्ती करून, याकडे दुर्लक्ष करत असतात. पावसाळ्यात शहरातील एखादी इमारत कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अत्यंत धोकादायक इमारती या तोडण्याची गरज आहे.