शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण? दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच लोकमत न्यूज नेटवर्क ...

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकाला नोटीस बजावण्यात येते. मात्र त्यापलीकडे महापालिका प्रशासनाकडून इतर कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती असून, यामध्ये तब्बल ६००हून अधिक नागरिक राहत आहेत. पावसाळ्यात दुर्दैवाने काही घटना घडल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

या इमारतींमध्ये राहण्याची इच्छा येथील रहिवाशांची नसली तरी पर्याय नसल्याने या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची खंत या इमारतीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच या ठिकाणी एक-एक रात्र काढावी लागते. मरण्याची हौस नसली तरी पर्याय नसल्यामुळे याठिकाणी दिवस काढावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मनपाकडून दरवर्षी नोटिसांचा सोपस्कार पार पाडला जातो, घरमालकांना इशारे दिले जातात, मात्र कारवाई कोणतीही होत नाही. घरमालक इमारतींची दुरुस्तीदेखील करत नाहीत अन् मनपा प्रशासनाकडून त्या घरमालकांवर कोणतीही कारवाईदेखील केली जात नाही. या परिस्थितीमुळे मात्र या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा पावसाळ्यातील प्रत्येक रात्र जीव मुठीत घेऊन काढावी लागत असते. जळगाव शहरात इमारत कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सारे कळते मात्र कुठे जाणार?

आम्ही राहत असलेली इमारत धोकेदायक असली तरी इतर कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर किरकोळ दुरुस्ती करून या इमारतींमध्ये दिवस काढावे लागत आहे.

- रघुनाथ सोनवणे, रहिवासी

इमारत धोकेदायक असल्याने या ठिकाणी पावसाळ्यातील कमीत कमी दिवस राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच दरवर्षी किरकोळ दुरुस्ती करून, पावसाळ्याच्या हंगाम संपण्याची वाट पाहत असतो.

-कमलबाई माळी, रहिवासी

जळगाव शहरात घरभाडे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महागाईच्या काळात मिळेल त्या घरात काही काळ वास्तव्य करावे लागले तरी, ते काढण्याचे प्रयत्न असतात. इमारत कोसळण्याची भीती तर असतेच, मात्र पर्याय तरी आमच्याकडे काय आहेत.

- लादू सुरवाडे, रहिवासी

वारंवार दिल्या नोटिसा

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा दिल्या जातात. त्यांना घर सोडण्याची किंवा घराची दुरुस्ती करण्यासंदर्भात सांगितले जात असते. मात्र दरवर्षी अनेक घरमालक इमारतीची किरकोळ दुरुस्ती करून वेळ मारून नेतात, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती आहेत.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

शहरातील धोकेदायक इमारतींमध्ये बहुतांश रहिवासी हे भाडेधारक आहेत. मनपा प्रशासनाकडून या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची जबाबदारी पार पाडली जाते तर इमारत मालकदेखील किरकोळ दुरुस्ती करून, याकडे दुर्लक्ष करत असतात. पावसाळ्यात शहरातील एखादी इमारत कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अत्यंत धोकादायक इमारती या तोडण्याची गरज आहे.