शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या ३०६५ जागांसाठी ५९३९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात २९६ पात्र ...

जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात २९६ पात्र शाळेत ३ हजार ६५ जागांसाठी ५ हजार ९३९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

आरटीईतंर्गत इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे. ३ ते ३० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्‍याची मुदत देण्‍यात आली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी ५ हजार ९३९ पालकांनी अर्ज केले आहेत. आता गोरगरिब मुलांना नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ''''डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह'''' करण्याचे काम पूर्ण करावे. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

आता लक्ष लॉटरीकडे

पालकांना अर्ज करण्‍याची मुदत संपली आहे. आता प्रतीक्षा आहे ती लॉटरीची. लवकरच ती सुध्दा जाहीर होणार आहे. नंतर लॉटरीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश निश्चित करून घ्यावयाचा आहे. त्याआधी पालकांनी दिलेले कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतरचं प्रवेश निश्चित होणार आहे.

============================================

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही....

आरटीईच्या माध्‍यातून मुलांना चांगले शिक्षण मिळते. स्वप्नातही पाहू शकत नाही, अशा शाळांमध्‍ये पाल्यास प्रवेश मिळतो. ही प्रक्र‍िया दरवर्षी राबवावी. जेणे करून गोरगरिबांच्या मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळेल व कुटूंबाची स्थितीही सुधारेल.

- समाधान पाटील, पालक

दरवर्षी हजाराच्यावर आरटीईच्या जागा रिक्त राहतात. या जागा रिक्त राहणार नाही, यासाठी शिक्षण विभागाने पाउल उचलले पाहिजे. शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणण्यासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेणे आवश्यक आहे.

- मुकेश मोरे, पालक

ज्या गावात राहत नाही. मात्र, प्रवेशा पुरता भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून अनेक पालक गोरगरिब विद्यार्थ्यांच्या जागांवर त्यांच्या पाल्यांचे प्रवेश मिळवितात. यामुळे दर्जेदार शिक्षणापासून गोरगरिब कुटूंबातील वंचित राहतो. त्यामुळे पालक प्रत्यक्ष कुठ राहतात, याचीही पडताळणी होणे अपेक्षित आहे.

- पांडुरंग गायकवाड, पालक

जळगाव जिल्ह्यातून ५ हजार ९३९ पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले आहे. लवकरच लॉटरी घोषित होणार आहे. लॉटरी निघालेल्या पालकांना संदेश पाठविला जाईल.

- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

==========================

आरटीईतंर्गत किती शाळांची नोंदणी - २९६

एकूण जागा - ३,०६५

एकूण प्राप्त अर्ज - ५९३९

=============================

तालुका शाळा जागा

अमळनेर १६ १६५

भडगाव २१ १५५

भुसावळ २१ २९१

बोदवड ८ ४१

चाळीसगाव २६ २१५

चोपडा १५ १६१

धरणगाव १५ १३४

एरंडोल २० ९९

जळगाव ग्रामीण २४ २५९

जळगाव शहर ३३ ५४१

जामनेर १२ १२०

मुक्ताईनगर ११ १२५

पाचोरा १८ २६५

पारोळा १६ १३६

रावेर २२ १४०

यावल १८ ११८