शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जळगाव जिल्ह्यात पावसाळ््यातील १२१ दिवसांपैकी ५६ दिवस वरुणराजाचा रुसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:11 IST

निम्मा पावसाळा कोरडाच

ठळक मुद्देतीन वेळा ३२ दिवसांचा खंडतीन वर्षांनंतर पुन्हा ७० टक्केच्या आत पाऊस

विजयकुमार सैतवालजळगाव : यंदा जिल्ह्यात केवळ ६७.४ टक्केच पाऊस झाला असून पावसाळ््यातील चार महिन्यांमधील तब्बल ५६ दिवस पाऊसच झाला नाही. त्यामुळे निम्मा पावसाळा कोरडाच गेला. यंदा तब्बल तीन वेळा पावसाने एकूण ३२ दिवस खंड दिला असून ३ वर्षानंतर पुन्हा ७० टक्केच्या आतच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शासकीय पावसाळा आज, ३० सप्टेंबर रोजी संपला.पावसाळ््याच्या सुरुवातीपासूनच यंदा वरुणराजाने सर्वांची चिंता वाढविली व शेवटपर्यंत कायम राहिली. यामध्ये केवळ आॅगस्ट महिन्यातील दमदार पाऊस दिलासा देऊन गेला. मात्र अखेरपर्यंत पावसाची आकडेवारी ६८ टक्क्यापर्यंतदेखील पोहचू शकली नाही. जून महिन्याचा पहिला दिवस कोरडा गेल्यानंतर २ जून रोजी केवळ रावेर व चाळीसगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र तीदेखील नोंद होण्यासारखी नव्हती. त्यानंतर मात्र ३ जून रोजी जिल्हाभरात एकाच दिवसात १०७.४ मि.मी. पाऊस झाला व सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र पुन्हा पावसाची दांडी सुरूच राहिली. अखेर २३ जून रोजी जिल्हाभरात २१७.५ मि.मी. पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. यंदाच्या पावसाळ््यात प्रथमच दोन आकडी टक्केवारी (१०.७ टक्के) गाठली. त्यानंतर १८ दिवसांनी ११ जुलै रोजी २७८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.अडीच महिन्यानंतर गाठली पन्नाशी१६ आॅगस्ट पर्यंत केवळ ३९.९ टक्के पावसाची नोंद असताना १७ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात जोरदार पाऊस होऊन एकाच दिवसात ११२१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने एका दिवसात पावसाची टक्केवारी ११.३ टक्क्याने वाढून ५१.२ टक्के एकूण पावसाची नोंद झाली व यंदाच्या पावसाळ््याने पन्नाशी गाठली. त्यानंतर जोरदार पावसाने जी पाठ फिरविली ती शेवटपर्यंत कायम राहिली. यादरम्यान केवळ २१ आॅगस्ट रोजी ५४० मि.मी., २२ आॅगस्ट रोजी २५८.१ मि.मी., २२ सप्टेंबर रोजी ३२०.४ मि.मी. असे केवळ तीनच दिवस दमदार पाऊस झाला.तीन वेळा खंड२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर एकूण ५६ दिवस पाऊस झालाच नाही. यामध्ये ११ ते १७ जून असे सात दिवस पाऊस नव्हता. त्यानंतर २७ जुलै ते ९ आॅगस्ट असे १४ दिवस, त्यानंतर ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान असे ११ दिवस पावसाने खंड दिला.पाच वर्षात दुसऱ्यांदा कमी पाऊसगेल्या पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता दुसºयांदा ७० टक्केच्या आत पाऊस झाला आहे. यामध्ये केवळ २०१४ व २०१६मध्ये पावसाने नव्वदी पार केली आहे. यात २०१४मध्ये ९२.८ टक्के व २०१६मध्ये ९५.९ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र २०१५मध्ये केवळ ६४.४ टक्के व त्यानंतर यंदा २०१८मध्ये पुन्हा ६७.४ टक्केच पाऊस झाला. गेल्या वर्षी २०१७मध्येदेखील ७२.६ टक्केच पाऊस झाला होता.गेल्यावर्षीपेक्षा ५.२ टक्क्याने कमी पाऊसगेल्या वर्षी २०१७मध्ये ७२.६ टक्के पाऊस झाला होता. त्यात पुन्हा घट होऊन यंदा ५.२ टक्क्याने पाऊस कमी झाला व हा आकडा ६७.४ टक्क्यांवर आला.एरंडोल व धरणगाव तालुक्यावरच कृपादृष्टीयंदाची तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता केवळ एरंडोल तालुक्यात ८८.९ टक्के अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल धरणगाव तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात ७९.३ टक्के, बोदवड तालुक्यात ७५.१ टक्के व रावेर तालुक्यात ७१.५ टक्के पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात मात्र ७० टक्केच्या आतच पाऊस झाला आहे.२९ सप्टेंबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊसतालुका एकूण पाऊसजळगाव ६३.४जामनेर ६४.६एरंडोल ८८.९धरणगाव ८४भुसावळ ५५यावल ५६.७रावेर ७१.५मुक्ताईनगर ६०.४बोदवड ७५.१पाचोरा ६२.९चाळीसगाव ६६.७भडगाव ६१.१अमळनेर ५७.४पारोळा ७९.३चोपडा ६६.६एकूण ६७.४ (पाऊस टक्केवारीत)

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव