शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पावसाळ््यातील १२१ दिवसांपैकी ५६ दिवस वरुणराजाचा रुसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:11 IST

निम्मा पावसाळा कोरडाच

ठळक मुद्देतीन वेळा ३२ दिवसांचा खंडतीन वर्षांनंतर पुन्हा ७० टक्केच्या आत पाऊस

विजयकुमार सैतवालजळगाव : यंदा जिल्ह्यात केवळ ६७.४ टक्केच पाऊस झाला असून पावसाळ््यातील चार महिन्यांमधील तब्बल ५६ दिवस पाऊसच झाला नाही. त्यामुळे निम्मा पावसाळा कोरडाच गेला. यंदा तब्बल तीन वेळा पावसाने एकूण ३२ दिवस खंड दिला असून ३ वर्षानंतर पुन्हा ७० टक्केच्या आतच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शासकीय पावसाळा आज, ३० सप्टेंबर रोजी संपला.पावसाळ््याच्या सुरुवातीपासूनच यंदा वरुणराजाने सर्वांची चिंता वाढविली व शेवटपर्यंत कायम राहिली. यामध्ये केवळ आॅगस्ट महिन्यातील दमदार पाऊस दिलासा देऊन गेला. मात्र अखेरपर्यंत पावसाची आकडेवारी ६८ टक्क्यापर्यंतदेखील पोहचू शकली नाही. जून महिन्याचा पहिला दिवस कोरडा गेल्यानंतर २ जून रोजी केवळ रावेर व चाळीसगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र तीदेखील नोंद होण्यासारखी नव्हती. त्यानंतर मात्र ३ जून रोजी जिल्हाभरात एकाच दिवसात १०७.४ मि.मी. पाऊस झाला व सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र पुन्हा पावसाची दांडी सुरूच राहिली. अखेर २३ जून रोजी जिल्हाभरात २१७.५ मि.मी. पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. यंदाच्या पावसाळ््यात प्रथमच दोन आकडी टक्केवारी (१०.७ टक्के) गाठली. त्यानंतर १८ दिवसांनी ११ जुलै रोजी २७८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.अडीच महिन्यानंतर गाठली पन्नाशी१६ आॅगस्ट पर्यंत केवळ ३९.९ टक्के पावसाची नोंद असताना १७ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात जोरदार पाऊस होऊन एकाच दिवसात ११२१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने एका दिवसात पावसाची टक्केवारी ११.३ टक्क्याने वाढून ५१.२ टक्के एकूण पावसाची नोंद झाली व यंदाच्या पावसाळ््याने पन्नाशी गाठली. त्यानंतर जोरदार पावसाने जी पाठ फिरविली ती शेवटपर्यंत कायम राहिली. यादरम्यान केवळ २१ आॅगस्ट रोजी ५४० मि.मी., २२ आॅगस्ट रोजी २५८.१ मि.मी., २२ सप्टेंबर रोजी ३२०.४ मि.मी. असे केवळ तीनच दिवस दमदार पाऊस झाला.तीन वेळा खंड२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर एकूण ५६ दिवस पाऊस झालाच नाही. यामध्ये ११ ते १७ जून असे सात दिवस पाऊस नव्हता. त्यानंतर २७ जुलै ते ९ आॅगस्ट असे १४ दिवस, त्यानंतर ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान असे ११ दिवस पावसाने खंड दिला.पाच वर्षात दुसऱ्यांदा कमी पाऊसगेल्या पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता दुसºयांदा ७० टक्केच्या आत पाऊस झाला आहे. यामध्ये केवळ २०१४ व २०१६मध्ये पावसाने नव्वदी पार केली आहे. यात २०१४मध्ये ९२.८ टक्के व २०१६मध्ये ९५.९ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र २०१५मध्ये केवळ ६४.४ टक्के व त्यानंतर यंदा २०१८मध्ये पुन्हा ६७.४ टक्केच पाऊस झाला. गेल्या वर्षी २०१७मध्येदेखील ७२.६ टक्केच पाऊस झाला होता.गेल्यावर्षीपेक्षा ५.२ टक्क्याने कमी पाऊसगेल्या वर्षी २०१७मध्ये ७२.६ टक्के पाऊस झाला होता. त्यात पुन्हा घट होऊन यंदा ५.२ टक्क्याने पाऊस कमी झाला व हा आकडा ६७.४ टक्क्यांवर आला.एरंडोल व धरणगाव तालुक्यावरच कृपादृष्टीयंदाची तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता केवळ एरंडोल तालुक्यात ८८.९ टक्के अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल धरणगाव तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात ७९.३ टक्के, बोदवड तालुक्यात ७५.१ टक्के व रावेर तालुक्यात ७१.५ टक्के पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात मात्र ७० टक्केच्या आतच पाऊस झाला आहे.२९ सप्टेंबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊसतालुका एकूण पाऊसजळगाव ६३.४जामनेर ६४.६एरंडोल ८८.९धरणगाव ८४भुसावळ ५५यावल ५६.७रावेर ७१.५मुक्ताईनगर ६०.४बोदवड ७५.१पाचोरा ६२.९चाळीसगाव ६६.७भडगाव ६१.१अमळनेर ५७.४पारोळा ७९.३चोपडा ६६.६एकूण ६७.४ (पाऊस टक्केवारीत)

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव