शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जळगाव जिल्ह्यात पावसाळ््यातील १२१ दिवसांपैकी ५६ दिवस वरुणराजाचा रुसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:11 IST

निम्मा पावसाळा कोरडाच

ठळक मुद्देतीन वेळा ३२ दिवसांचा खंडतीन वर्षांनंतर पुन्हा ७० टक्केच्या आत पाऊस

विजयकुमार सैतवालजळगाव : यंदा जिल्ह्यात केवळ ६७.४ टक्केच पाऊस झाला असून पावसाळ््यातील चार महिन्यांमधील तब्बल ५६ दिवस पाऊसच झाला नाही. त्यामुळे निम्मा पावसाळा कोरडाच गेला. यंदा तब्बल तीन वेळा पावसाने एकूण ३२ दिवस खंड दिला असून ३ वर्षानंतर पुन्हा ७० टक्केच्या आतच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शासकीय पावसाळा आज, ३० सप्टेंबर रोजी संपला.पावसाळ््याच्या सुरुवातीपासूनच यंदा वरुणराजाने सर्वांची चिंता वाढविली व शेवटपर्यंत कायम राहिली. यामध्ये केवळ आॅगस्ट महिन्यातील दमदार पाऊस दिलासा देऊन गेला. मात्र अखेरपर्यंत पावसाची आकडेवारी ६८ टक्क्यापर्यंतदेखील पोहचू शकली नाही. जून महिन्याचा पहिला दिवस कोरडा गेल्यानंतर २ जून रोजी केवळ रावेर व चाळीसगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र तीदेखील नोंद होण्यासारखी नव्हती. त्यानंतर मात्र ३ जून रोजी जिल्हाभरात एकाच दिवसात १०७.४ मि.मी. पाऊस झाला व सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र पुन्हा पावसाची दांडी सुरूच राहिली. अखेर २३ जून रोजी जिल्हाभरात २१७.५ मि.मी. पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. यंदाच्या पावसाळ््यात प्रथमच दोन आकडी टक्केवारी (१०.७ टक्के) गाठली. त्यानंतर १८ दिवसांनी ११ जुलै रोजी २७८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.अडीच महिन्यानंतर गाठली पन्नाशी१६ आॅगस्ट पर्यंत केवळ ३९.९ टक्के पावसाची नोंद असताना १७ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात जोरदार पाऊस होऊन एकाच दिवसात ११२१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने एका दिवसात पावसाची टक्केवारी ११.३ टक्क्याने वाढून ५१.२ टक्के एकूण पावसाची नोंद झाली व यंदाच्या पावसाळ््याने पन्नाशी गाठली. त्यानंतर जोरदार पावसाने जी पाठ फिरविली ती शेवटपर्यंत कायम राहिली. यादरम्यान केवळ २१ आॅगस्ट रोजी ५४० मि.मी., २२ आॅगस्ट रोजी २५८.१ मि.मी., २२ सप्टेंबर रोजी ३२०.४ मि.मी. असे केवळ तीनच दिवस दमदार पाऊस झाला.तीन वेळा खंड२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर एकूण ५६ दिवस पाऊस झालाच नाही. यामध्ये ११ ते १७ जून असे सात दिवस पाऊस नव्हता. त्यानंतर २७ जुलै ते ९ आॅगस्ट असे १४ दिवस, त्यानंतर ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान असे ११ दिवस पावसाने खंड दिला.पाच वर्षात दुसऱ्यांदा कमी पाऊसगेल्या पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता दुसºयांदा ७० टक्केच्या आत पाऊस झाला आहे. यामध्ये केवळ २०१४ व २०१६मध्ये पावसाने नव्वदी पार केली आहे. यात २०१४मध्ये ९२.८ टक्के व २०१६मध्ये ९५.९ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र २०१५मध्ये केवळ ६४.४ टक्के व त्यानंतर यंदा २०१८मध्ये पुन्हा ६७.४ टक्केच पाऊस झाला. गेल्या वर्षी २०१७मध्येदेखील ७२.६ टक्केच पाऊस झाला होता.गेल्यावर्षीपेक्षा ५.२ टक्क्याने कमी पाऊसगेल्या वर्षी २०१७मध्ये ७२.६ टक्के पाऊस झाला होता. त्यात पुन्हा घट होऊन यंदा ५.२ टक्क्याने पाऊस कमी झाला व हा आकडा ६७.४ टक्क्यांवर आला.एरंडोल व धरणगाव तालुक्यावरच कृपादृष्टीयंदाची तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता केवळ एरंडोल तालुक्यात ८८.९ टक्के अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल धरणगाव तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात ७९.३ टक्के, बोदवड तालुक्यात ७५.१ टक्के व रावेर तालुक्यात ७१.५ टक्के पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात मात्र ७० टक्केच्या आतच पाऊस झाला आहे.२९ सप्टेंबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊसतालुका एकूण पाऊसजळगाव ६३.४जामनेर ६४.६एरंडोल ८८.९धरणगाव ८४भुसावळ ५५यावल ५६.७रावेर ७१.५मुक्ताईनगर ६०.४बोदवड ७५.१पाचोरा ६२.९चाळीसगाव ६६.७भडगाव ६१.१अमळनेर ५७.४पारोळा ७९.३चोपडा ६६.६एकूण ६७.४ (पाऊस टक्केवारीत)

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव