शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नाशिक विभागातील बारावीच्या ५ लाख उत्तरपत्रिका तपासणी अभावी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:22 IST

तोडगा न निघाल्यास निकाल लांबणार : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संपाचा परिणाम

ठळक मुद्देजळगावसह राज्यभरातील बारावीच्या उत्तरपत्रिका पडूनमुख्य नियामकांची सभा न झाल्याने संभ्रमबारावीचा निकाल आठ ते दहा दिवस लांबणीवर पडणार

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.२७ : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नाशिक बोर्डातील बारावीच्या १ लाख ६८ हजार २०० विद्यार्थ्यांच्या चार विषयांच्या सुमारे पाच लाख उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून आहेत. संपाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी तीन वर्षात तब्बल २७ वेळा आंदोलन करण्यात आले आहे. त्यानुसार महासंघाच्या पदाधिकाºयांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेत आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही कनिष्ठ प्राध्यापकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कनिष्ठ प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.मुख्य नियामकांची सभा न झाल्याने संभ्रमदहावी व बारावीच्या परीक्षेच्या तयारीबाबत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेच्या नियामकांची बैठक होत असते. या बैठकीत पुणे येथील मुख्य नियामक मार्गदर्शन करीत असतात. त्यात पेपर तपासणी, निकालाचे नियोजन याबाबत मुख्य नियामक सूचना देत असतात. मात्र संपामुळे पुणे येथील मुख्य नियामकांची बैठक न झाल्याने इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीबाबत परीक्षा नियंत्रकांना कोणत्याही सूचना नसल्याने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जळगावसह राज्यभरातील बारावीच्या उत्तरपत्रिका पडूनजळगाव जिल्ह्यातून ५१ हजार ३०८ विद्यार्थी तर नाशिक बोर्डातंर्गत येणाºया जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यातून एक लाख ६८ हजार २०० विद्यार्थी १२ वीची परीक्षा देत आहेत. आतापर्यंत इंग्रजी, मराठी, हिंदी व भौतिकशास्त्र या चार विषयांचे पेपर झालेले आहेत. त्यामुळे एकट्या नाशिक बोर्डातील सुमारे पाच लाखांवर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कस्टडीत पडून असल्याची माहिती मिळाली....तर निकाल लांबणीवर पडणारसध्या बारावीच्या परीक्षेचा निकाल १ जूनपर्यंत लावण्यात येत असतो. मात्र पेपर तपासणीबाबत लवकर निर्णय न झाल्यास यावर्षी निकाल ८ ते १० दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात कनिष्ठ प्राध्यापकांचे प्रबोधन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होईल.एम.व्ही.कदम, सहसचिव, नाशिक बोर्ड.कनिष्ठ प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात आम्ही ३ वर्षात २७ वेळा आंदोलन केले आहे. विधीमंडळातील आमदारांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना संपाची कोंडी फोडण्यास भाग पाडावे. १२ वीच्या निकालास विलंब झाल्यास विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका आहे.- सुनील गरूड,ज्येष्ठ मार्गदर्शक, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.

टॅग्स :Jalgaonजळगावexamपरीक्षा