शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:15 IST

२९५ कामे केली तातडीने पूर्ण

ठळक मुद्दे १४२ ठिकाणांहून अद्यापही होतेय पाण्याची नासाडी

जळगाव : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने गळत्या व त्यातून होणारी पाण्याची नासाडी या विषयावर ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन शहरातील गळत्यांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश होते. पाणी पुरवठा विभागाच्या विभाग कार्यालयांनी केलेल्या पाहणीत सुमारे ४३७ लहान मोठ्या गळत्या आढळून आल्या असून २९५ गळत्या बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणांहून पाण्याचा अपव्यय हा सुरूच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.वाघूर धरणात यंदा जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन शिल्लक असलेला साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने आरक्षित केला आहे. तसेच भविष्यात शहरास गंभीर अशा पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून तीन किंवा चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस करण्यात आल्या आहेत.नागरिकांसाठी काटकसर पण गळत्यांमुळे पाणी अपव्ययनागरिकांसाठी पाण्याची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर दुसरीकडे वाघूर धरणाच्या नजीक असलेल्या शेतांमधून शेकडो पंप लावून सुरू असलेली पाण्याची चोरी व वाघूर धरणापासून शहरापर्यंत येणाऱ्या पाईप लाईनवरील गळती तसेच शहरातील विविध भागातून जाणाºया पाईप लाईनरील गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी मनपा ज्या प्रमाणात पाणी उचलते त्यांच्या ३० टक्के पाणी हे रोज वाया जात असल्याचा मनपाचा अहवाल आहे. या व्यतिरिक्त शहरातील गळत्यांचा विचार केल्यास हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे.पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरूचशहरात पाणी पुरवठा विभागाचे ९ युनिट कार्यालय आहेत. या कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील गळत्यांची महिना भरातील माहिती सादर करण्याचे आदेश होते. त्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात ४३७ ठिकाणी लहान, मोठ्या गळत्या आढळून आल्याचे या अहवालात नमुद आहे. त्यापैकी २९५ गळत्या तातडीने बंद करण्यात आल्या असल्याचे कळविले असून १४२ गळत्या अद्यापही कायम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.मनपा तसेच जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरून ‘लोकमत’ने शहरात पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन वरून होणाºया गळत्या व पाण्याचा होत असलेला अपव्यय याबाबत नागरिकांना आवाहन करून माहिती कळविण्याच्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनी त्यास उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या भागातील गळत्यांची माहिती छायाचित्रासह पाठविली होती. या संदर्भात प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पाणी पुरवठा विभागास शहरातील गळत्यांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार शनिवारी हा अहवाल सादर करण्यात आला.