शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:15 IST

२९५ कामे केली तातडीने पूर्ण

ठळक मुद्दे १४२ ठिकाणांहून अद्यापही होतेय पाण्याची नासाडी

जळगाव : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने गळत्या व त्यातून होणारी पाण्याची नासाडी या विषयावर ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन शहरातील गळत्यांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश होते. पाणी पुरवठा विभागाच्या विभाग कार्यालयांनी केलेल्या पाहणीत सुमारे ४३७ लहान मोठ्या गळत्या आढळून आल्या असून २९५ गळत्या बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणांहून पाण्याचा अपव्यय हा सुरूच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.वाघूर धरणात यंदा जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन शिल्लक असलेला साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने आरक्षित केला आहे. तसेच भविष्यात शहरास गंभीर अशा पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून तीन किंवा चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस करण्यात आल्या आहेत.नागरिकांसाठी काटकसर पण गळत्यांमुळे पाणी अपव्ययनागरिकांसाठी पाण्याची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर दुसरीकडे वाघूर धरणाच्या नजीक असलेल्या शेतांमधून शेकडो पंप लावून सुरू असलेली पाण्याची चोरी व वाघूर धरणापासून शहरापर्यंत येणाऱ्या पाईप लाईनवरील गळती तसेच शहरातील विविध भागातून जाणाºया पाईप लाईनरील गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी मनपा ज्या प्रमाणात पाणी उचलते त्यांच्या ३० टक्के पाणी हे रोज वाया जात असल्याचा मनपाचा अहवाल आहे. या व्यतिरिक्त शहरातील गळत्यांचा विचार केल्यास हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे.पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरूचशहरात पाणी पुरवठा विभागाचे ९ युनिट कार्यालय आहेत. या कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील गळत्यांची महिना भरातील माहिती सादर करण्याचे आदेश होते. त्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात ४३७ ठिकाणी लहान, मोठ्या गळत्या आढळून आल्याचे या अहवालात नमुद आहे. त्यापैकी २९५ गळत्या तातडीने बंद करण्यात आल्या असल्याचे कळविले असून १४२ गळत्या अद्यापही कायम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.मनपा तसेच जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरून ‘लोकमत’ने शहरात पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन वरून होणाºया गळत्या व पाण्याचा होत असलेला अपव्यय याबाबत नागरिकांना आवाहन करून माहिती कळविण्याच्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनी त्यास उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या भागातील गळत्यांची माहिती छायाचित्रासह पाठविली होती. या संदर्भात प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पाणी पुरवठा विभागास शहरातील गळत्यांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार शनिवारी हा अहवाल सादर करण्यात आला.