शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शहरातील ४२ लाख लीटर सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाजीनगरातील जुन्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्यातील सुमारे १० एकर जागेवर तयार होणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाचे कामदेखील ६० टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील सुमारे ४२ लाख लीटर वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे नदी, नाल्यांमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर भविष्यात शेतीसाठी केला जाणार आहे. तसेच या पाण्याव्दारे मनपा प्रशासनाला उत्पन्नाचा नवा स्त्रोतदेखील मिळणार आहे.

भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ६५ टक्के

एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी

मुदत - सप्टेंबर २०२१

मक्तेदार - एल.सी.इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद

जलवाहिनी टाकण्याचे काम - २०३ किमीपैकी ११० किमी

-मलनिस्सारण प्रकल्पाला एकूण खर्च ४७ कोटी इतका अपेक्षित आहे

-या प्रकल्पाची एकूण क्षमता ४२ लाख लीटर इतकी आहे.

-शहरातील ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात होणार प्रक्रिया

-आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत प्रकल्प होणार कार्यान्वित

-शिवाजीनगर भागातील जुन्या खत कारखान्याचा जागेवर सुमारे १० एकराच्या क्षेत्रावर प्रकल्पाचे काम सुरू

- दोन मोठ्या विहिरींमध्ये जमा होणार पाणी, चार केंद्रांमध्ये होणार प्रक्रिया

काय होणार फायदा

१. शहरातील जे सांडपाणी नाल्यावाटून गिरणा नदीपात्रात जात होते, ते पाणी आता नदीत जाणार नाही.

२. नदीमध्ये होणारे जलप्रदूषण थांबेल

३. शहरातील लेंडीनाल्यातील ७० टक्के पाणी कमी होईल, लेंडी नाल्यातून केवळ पावसाचे पाणी जाणार

४. लेंडी नाल्यामुळे शहरातील होणारे जल व वायू प्रदूषणातदेखील मोठी घट होईल.

सांडपाण्याचा वापर औद्योगिक व शेतीसाठी होणार

शहरातील ५० टक्के भागातील सांडपाणी या मलनिस्सारण प्रकल्पात जमा होणार आहे. या प्रकल्पात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ६० ते ६५ टक्के शुध्द पाण्याचा वापर औद्यागिक व कृषी क्षेत्रासाठी होणार आहे. हे पाणी मनपा प्रशासनाकडून विक्री करून या पाण्याव्दारे मनपाला उत्पन्न देखील मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात दुसरा प्रकल्प होणार सुरू

शहरात भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या उर्वरित भागासाठी दुसऱ्या टप्प्याचे काम मंजूर होऊन सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या प्रकल्पाचे काम देखील सुरू होणार असून, त्यानंतर उर्वरित भागातील सांडपाण्यावर देखील प्रक्रिया होऊन गिरणा नदी, मेहरूण तलावात जाणाऱे दूषित पाणी थांबून पर्यावरणाचा होणारा ऱ्हासदेखील थांबणार आहे.

कोट..

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम जवळपास ६० टक्के झाले असून, जुलै २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रक्रिया होणार आहे. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा