शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रावेर तालुक्यात ३० गावातील ४१७.४ हेक्टर केळी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:35 IST

३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देपंचनाम्यांचा अंतिम अहवालवादळी पावसाचा फटका

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली. त्यात १६ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी सादर केला आहे.निसर्ग वादळाच्या तडाख्याचे अंशत: पडसाद केºहाळे बुद्रूक, मंगरूळ, जुनोने, पाल व रावेर येथील १४ शेतकऱ्यांच्या १६.७६ हेक्टर पैकी ५.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा बाधित होऊन २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करून अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे.दरम्यान, तालुक्यातील निंभोरा, विवरे खुर्द, वडगाव, चिनावव कुंभारखेडा परिसरात दि १० जून रोजी दुपारी वादळी पावसाने तडाखा दिला होता. किंबहुना, अवघ्या पाच सहा तासांनी ते शमलेले चक्रीवादळाने जोरदार पावसासह घोंघावत रात्री बोरखेडा, तामसवाडी, रावेर, पुनखेडा, पातोंडी परिसरासह दसनूर, विवरे बु।।, मोरगाव बु।।, मोरगाव खुर्द, अटवाडे, वाघोड, कर्जोद, भोकरी,खिरवड, थेरोळा, धुरखेडा, भाटखेडा, कोचूर परिसरातील २७ गावातील शेतीशिवारातील ८००.१४ हेक्टर पैकी ४११.४८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने ५१.४२ टक्के नुकसान होवून १६ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करून आज अंतिम अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.सर्वाधिक नुकसानदरम्यान, निंभोरा बु।। येथील १८३ शेतकºयांचे १२१.२४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट होवून ४ कोटी ८४ लाख ९६ हजार रू चे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. विवरे खुर्द येथील १७० शेतकºयांचे ११९.०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून ४ कोटी ७६ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे. रावेर शिवारातील १२५ शेतकºयांच्या ९६.२४ हेक्टर क्षेत्रात केळीबागा बाधित होवून ३ कोटी ८४ लाख ९६ हजारांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. वडगाव येथील ४३ हेक्टर क्षेत्रात केळी बाधित होऊन ९८ लाख ८० हजार रू चे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान, इतर २३ गावातील शेतकºयांचे नुकसानीचे बाधित क्षेत्र १० हेक्टरच्या आत आहे. दोन्ही वादळी पावसाच्या तडाख्यात ४१७.४ हेक्टर केळीबागा बाधित होऊ १६ कोटी ६९ लाख ६० हजारांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. तद्वतच, १६ जून रोजी झालेल्या वादळी पावसातील नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर