शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रावेर तालुक्यात ३० गावातील ४१७.४ हेक्टर केळी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:35 IST

३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देपंचनाम्यांचा अंतिम अहवालवादळी पावसाचा फटका

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली. त्यात १६ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी सादर केला आहे.निसर्ग वादळाच्या तडाख्याचे अंशत: पडसाद केºहाळे बुद्रूक, मंगरूळ, जुनोने, पाल व रावेर येथील १४ शेतकऱ्यांच्या १६.७६ हेक्टर पैकी ५.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा बाधित होऊन २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करून अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे.दरम्यान, तालुक्यातील निंभोरा, विवरे खुर्द, वडगाव, चिनावव कुंभारखेडा परिसरात दि १० जून रोजी दुपारी वादळी पावसाने तडाखा दिला होता. किंबहुना, अवघ्या पाच सहा तासांनी ते शमलेले चक्रीवादळाने जोरदार पावसासह घोंघावत रात्री बोरखेडा, तामसवाडी, रावेर, पुनखेडा, पातोंडी परिसरासह दसनूर, विवरे बु।।, मोरगाव बु।।, मोरगाव खुर्द, अटवाडे, वाघोड, कर्जोद, भोकरी,खिरवड, थेरोळा, धुरखेडा, भाटखेडा, कोचूर परिसरातील २७ गावातील शेतीशिवारातील ८००.१४ हेक्टर पैकी ४११.४८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने ५१.४२ टक्के नुकसान होवून १६ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करून आज अंतिम अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.सर्वाधिक नुकसानदरम्यान, निंभोरा बु।। येथील १८३ शेतकºयांचे १२१.२४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट होवून ४ कोटी ८४ लाख ९६ हजार रू चे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. विवरे खुर्द येथील १७० शेतकºयांचे ११९.०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून ४ कोटी ७६ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे. रावेर शिवारातील १२५ शेतकºयांच्या ९६.२४ हेक्टर क्षेत्रात केळीबागा बाधित होवून ३ कोटी ८४ लाख ९६ हजारांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. वडगाव येथील ४३ हेक्टर क्षेत्रात केळी बाधित होऊन ९८ लाख ८० हजार रू चे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान, इतर २३ गावातील शेतकºयांचे नुकसानीचे बाधित क्षेत्र १० हेक्टरच्या आत आहे. दोन्ही वादळी पावसाच्या तडाख्यात ४१७.४ हेक्टर केळीबागा बाधित होऊ १६ कोटी ६९ लाख ६० हजारांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. तद्वतच, १६ जून रोजी झालेल्या वादळी पावसातील नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर