शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

38 गावांना हिवाळ्यातही पाणीटंचाई

By admin | Updated: February 3, 2017 00:45 IST

ओडीए योजना : सारोळा केंद्रात लाखो लीटर पाण्याची नासाडी, बोदवडला दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

बोदवड : शहरासह बोदवड तालुक्यातील 38 गावांना उन्हाळ्याच्या पाणीटंचाईचे चटके हिवाळ्यात बसायला सुरुवात झाली आहे. बोदवड शहरातील  प्रभागांमध्ये  10 दिवस उलटले  तरी अजून  नळांना पाणी आले नसल्याची स्थिती सर्वच प्रभागात आहे. त्यामुळे हिवाळ्यातही पाणीटंचाईचा सामना शहर व तालुकावासीयांना करावा लागत आहे.बोदवड शहरासह तालुक्यातील 38 गावांची तहान ओडीएची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भागवत आहे. परंतु सन 2006 मध्ये कालबाह्य झालेली  ही  योजना अजूनही  अंतिम घटकेतही पाणीपुरवठा करीत आहे. या योजनेवरील पंपिंग करणारे तीन पंप आहेत. त्यापैकी दोन पंप अत्यंत जीर्ण झाल्याने बंद पडले होते. त्या ऐवजी अहमदाबाद येथील कंपनीकडून दोन पंप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून निधी मिळवून बसविण्यात आले आहेत. तर या तिन्ही पंपातून 24 तासात 1.22 (एम.एल.डी.) कोटी लीटर पाणी पंपातून म्हणजेच तासाला एक पंप तीन लाख 86 हजार लीटर पाणी उपसत असून ते साठवण टाकीर्पयत पोहचवले जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्याने  बसविण्यात आलेले दोन्ही पंप फक्त दोन लाख ते अडीच लाख लीटर पाणी शुद्ध  करीत असल्याने तासाला सुमारे 20 हजार लीटर पाणी (ओव्हर फ्लो) वाया जात आहे. नवीन पंपांच्या तुलनेत जुना 110 अश्वशक्तीचा पंप मात्र तीन लाख 86 हजार लीटर पाणी शुद्ध करीत आहे. गत आठवडय़ात नवीन पंपातील एका पंपात बिघाड झाल्याने पूर्ण  यंत्रणा बंद पडली होती तर आता पुन्हा पंप दुरुस्तीला  सुरुवात झाली आहे. पंरतु पूर्ण क्षमतेचे पाणी शुद्ध   होत नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होत  आहे. गळतीशिवाय  दिवसाकाठी पंप हाऊस केंद्रातूनच लाखो लीटर वाया जाणा:या पाण्यामुळे ऐन हिवाळ्यात ही अडचण निर्माण झाली आहे.एकंदरीत कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पंप क्षमतेपेक्षा जास्त पाणी फेकत नसल्याने बोदवड शहरासह 38 गावांना येणारा उन्हाळ्यार्पयत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाण्यासाठी : गृहिणींची वणवण.4बोदवडसह ग्रामीण भागाती रहिवाशांची थंडीच्या दिवसातही पाण्यासाठी वणवण होत आहे विशेष करुन गृहिणींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना ओडीएच्या सारोळा केंद्रात मात्र दररोज मोठय़ा प्रमाणावर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.क्षमतेपेक्षा कमी पाणी पपींग होत होते परंतु दुरूस्ती नंतर तीन लाख 86 हजार लीटर र्पयत पाणी आता उचल होत  आहे. अडचण सुटणार आहे. परंतु भविष्यात व उन्हाळय़ात पंपिगमध्ये बिघाड झाल्यास दोन पंप सुरळीत राहिल्यास अडचण येणार नाही मात्र दोन पंप बंद पडल्यास कंपनीचे  पथक व पंप आल्या शिवाय पंपिंगला अडचण ठरू शकते.- प्रवीण सोनवणे, वीजतंत्री सारोळा केंद्र