शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगावात ११ महिन्यात ३७५ जणांनी केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:15 IST

आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

ठळक मुद्देखर्चाला फाटा देण्यासाठी वधुवरांची पसंतीआता परदेशात बसूनही देता येते नोटीसजळगाव कार्यालयात आॅनलाईन सुविधा

चंद्रशेखर जोशीजळगाव : ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करून’ असे म्हटले जाते... वधू-वर पित्याला लग्नासाठी खर्चाचा प्रचंड आर्थिक भार उचलावा लागतो. आमंत्रणे देता-देता नाकेनऊ येतात. ही कसरत लक्षात घेऊन आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.जात- पोटजात, पत्रिका जुळविणे. त्या जुळल्या की मुला-मुलीची व पालकांची पसंती ते आटोपत नाही तर घेण्या-देण्याची बोलणी त्यात जमले की मग साखरपुडा व नंतर लग्नाच्या तारखेची निश्चिती असे एक ना अनेक प्रकार असतात. हा टप्पा पार पडला की सुरू होते प्रत्यक्ष लग्नाची तयारी. मग मंगल कार्यालय शोधा, वाजंत्री, मुला-मुलीचा व मानाचे कपडे, जेवणावळीची तयारी, मिरवणुकीसाठी घोडा व बग्गी, मानाच्या मंडळींकडे जाऊन आमंत्रणे देणे ही प्रक्रिया जवळपास महिनाभर चालत असते. वेळेचा व पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय या काळात होत असतो.हा होणारा त्रास लक्षात घेऊन हळूहळू या सर्व पद्धतींना फाटा देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. यासाठी उपलब्ध असलेली कायदेशिरपद्धती म्हणजे नोंदणी विवाह. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नोंदणी कार्यालयाकडे अनेक वधू-वर पित्यांची पावले वळत आहे. नोंदणी पद्धतीला पसंती देऊन रूढी परंपरा, खर्च याला फाटा देताना दिसून येतात.नोंदणी कार्यालयाकडून घेतली असता ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी (२०१७) मध्ये ३७७ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले होते. यावर्षी हा आकडा ८०० च्यावर जाण्याचीच शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.महिनाभरात ४३४ विवाह होणारदिवाळीनंतर बरेच विवाह मुहूर्त असतात. साधारणत: तुळशी विवाह आटोपला की लग्नांची धामधुम सुरू होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात लग्न करायचे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी (मुद्रांक) कार्यालयात ४३४ जणांनी नोटीस दिल्या आहेत.आॅन लाईनची सुविधापूर्र्वी कागदपत्रांची पूर्तता व अन्य कामे करण्यासाठी नोंदणी कार्यालयाच्या खेट्या घालाव्या लागत असत. आता त्यातही प्रगत तंत्रज्ञान आले आहे. अगदी परदेशात असले तरी तेथून एक महिना अगोदर आॅनलाईन नोटीस देऊन नोंदणी विवाहपूर्वीची प्रक्रिया पार पाडू शकतात. सर्वच खर्चिक बाबींना व कायदेशिर आधार प्राप्त होणाऱ्या पद्धतीला आता दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.

 नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. आॅन लाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.- सुनील पाटील, सह जिल्हा दुय्यम निबंधक, जळगाव.

टॅग्स :marriageलग्नJalgaonजळगाव