शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जळगावात ११ महिन्यात ३७५ जणांनी केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:15 IST

आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

ठळक मुद्देखर्चाला फाटा देण्यासाठी वधुवरांची पसंतीआता परदेशात बसूनही देता येते नोटीसजळगाव कार्यालयात आॅनलाईन सुविधा

चंद्रशेखर जोशीजळगाव : ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करून’ असे म्हटले जाते... वधू-वर पित्याला लग्नासाठी खर्चाचा प्रचंड आर्थिक भार उचलावा लागतो. आमंत्रणे देता-देता नाकेनऊ येतात. ही कसरत लक्षात घेऊन आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.जात- पोटजात, पत्रिका जुळविणे. त्या जुळल्या की मुला-मुलीची व पालकांची पसंती ते आटोपत नाही तर घेण्या-देण्याची बोलणी त्यात जमले की मग साखरपुडा व नंतर लग्नाच्या तारखेची निश्चिती असे एक ना अनेक प्रकार असतात. हा टप्पा पार पडला की सुरू होते प्रत्यक्ष लग्नाची तयारी. मग मंगल कार्यालय शोधा, वाजंत्री, मुला-मुलीचा व मानाचे कपडे, जेवणावळीची तयारी, मिरवणुकीसाठी घोडा व बग्गी, मानाच्या मंडळींकडे जाऊन आमंत्रणे देणे ही प्रक्रिया जवळपास महिनाभर चालत असते. वेळेचा व पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय या काळात होत असतो.हा होणारा त्रास लक्षात घेऊन हळूहळू या सर्व पद्धतींना फाटा देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. यासाठी उपलब्ध असलेली कायदेशिरपद्धती म्हणजे नोंदणी विवाह. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नोंदणी कार्यालयाकडे अनेक वधू-वर पित्यांची पावले वळत आहे. नोंदणी पद्धतीला पसंती देऊन रूढी परंपरा, खर्च याला फाटा देताना दिसून येतात.नोंदणी कार्यालयाकडून घेतली असता ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी (२०१७) मध्ये ३७७ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले होते. यावर्षी हा आकडा ८०० च्यावर जाण्याचीच शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.महिनाभरात ४३४ विवाह होणारदिवाळीनंतर बरेच विवाह मुहूर्त असतात. साधारणत: तुळशी विवाह आटोपला की लग्नांची धामधुम सुरू होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात लग्न करायचे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी (मुद्रांक) कार्यालयात ४३४ जणांनी नोटीस दिल्या आहेत.आॅन लाईनची सुविधापूर्र्वी कागदपत्रांची पूर्तता व अन्य कामे करण्यासाठी नोंदणी कार्यालयाच्या खेट्या घालाव्या लागत असत. आता त्यातही प्रगत तंत्रज्ञान आले आहे. अगदी परदेशात असले तरी तेथून एक महिना अगोदर आॅनलाईन नोटीस देऊन नोंदणी विवाहपूर्वीची प्रक्रिया पार पाडू शकतात. सर्वच खर्चिक बाबींना व कायदेशिर आधार प्राप्त होणाऱ्या पद्धतीला आता दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.

 नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. आॅन लाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.- सुनील पाटील, सह जिल्हा दुय्यम निबंधक, जळगाव.

टॅग्स :marriageलग्नJalgaonजळगाव