शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ११ महिन्यात ३७५ जणांनी केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:15 IST

आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

ठळक मुद्देखर्चाला फाटा देण्यासाठी वधुवरांची पसंतीआता परदेशात बसूनही देता येते नोटीसजळगाव कार्यालयात आॅनलाईन सुविधा

चंद्रशेखर जोशीजळगाव : ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करून’ असे म्हटले जाते... वधू-वर पित्याला लग्नासाठी खर्चाचा प्रचंड आर्थिक भार उचलावा लागतो. आमंत्रणे देता-देता नाकेनऊ येतात. ही कसरत लक्षात घेऊन आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.जात- पोटजात, पत्रिका जुळविणे. त्या जुळल्या की मुला-मुलीची व पालकांची पसंती ते आटोपत नाही तर घेण्या-देण्याची बोलणी त्यात जमले की मग साखरपुडा व नंतर लग्नाच्या तारखेची निश्चिती असे एक ना अनेक प्रकार असतात. हा टप्पा पार पडला की सुरू होते प्रत्यक्ष लग्नाची तयारी. मग मंगल कार्यालय शोधा, वाजंत्री, मुला-मुलीचा व मानाचे कपडे, जेवणावळीची तयारी, मिरवणुकीसाठी घोडा व बग्गी, मानाच्या मंडळींकडे जाऊन आमंत्रणे देणे ही प्रक्रिया जवळपास महिनाभर चालत असते. वेळेचा व पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय या काळात होत असतो.हा होणारा त्रास लक्षात घेऊन हळूहळू या सर्व पद्धतींना फाटा देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. यासाठी उपलब्ध असलेली कायदेशिरपद्धती म्हणजे नोंदणी विवाह. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नोंदणी कार्यालयाकडे अनेक वधू-वर पित्यांची पावले वळत आहे. नोंदणी पद्धतीला पसंती देऊन रूढी परंपरा, खर्च याला फाटा देताना दिसून येतात.नोंदणी कार्यालयाकडून घेतली असता ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी (२०१७) मध्ये ३७७ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले होते. यावर्षी हा आकडा ८०० च्यावर जाण्याचीच शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.महिनाभरात ४३४ विवाह होणारदिवाळीनंतर बरेच विवाह मुहूर्त असतात. साधारणत: तुळशी विवाह आटोपला की लग्नांची धामधुम सुरू होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात लग्न करायचे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी (मुद्रांक) कार्यालयात ४३४ जणांनी नोटीस दिल्या आहेत.आॅन लाईनची सुविधापूर्र्वी कागदपत्रांची पूर्तता व अन्य कामे करण्यासाठी नोंदणी कार्यालयाच्या खेट्या घालाव्या लागत असत. आता त्यातही प्रगत तंत्रज्ञान आले आहे. अगदी परदेशात असले तरी तेथून एक महिना अगोदर आॅनलाईन नोटीस देऊन नोंदणी विवाहपूर्वीची प्रक्रिया पार पाडू शकतात. सर्वच खर्चिक बाबींना व कायदेशिर आधार प्राप्त होणाऱ्या पद्धतीला आता दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.

 नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. आॅन लाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.- सुनील पाटील, सह जिल्हा दुय्यम निबंधक, जळगाव.

टॅग्स :marriageलग्नJalgaonजळगाव