शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

४२ हजार शेतकऱ्यांना ३५६ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:03 PM

रक्कम खात्यावर जमा झाल्याचा जिल्हा बँकेचा दावा

ठळक मुद्दे राष्टÑीयकृत बँकांकडून मात्र आदेश धाब्यावर सर्व विकासोंचे तक्ते मंजूर राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटप

जळगाव: जिल्हा बँकेकडून दरवर्षी खरीप हंगामासाठी सरासरी हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटप केले जात असताना यंदा मात्र जूनचा आठवडा उलटला तरीही ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाख ६४ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावरही जमा झाली असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या सूत्रांनी केला आहे.दरम्यान, राष्टÑीयकृत बँकांनी मात्र मुख्यमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही धाब्यावर बसविले असून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविली आहे. ४ जून पर्यंत जेमतेम ३ टक्केच कर्जवाटप केले असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना मात्र नाईलाजाने सावकाराची पायरी चढायची वेळ आली आहे.खरीप हंगाम सुरू होऊनही विविधकार्यकारीसोसायट्यांकडून कर्जमंजुरी तक्तेच जिल्हा बँकेकडे वेळेत सादर झालेले नसल्याने पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याची तक्रार होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्जही मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. याबाबत शेतकरी आंदोलन कृती समितीतर्फे मंगळवार, ५ जून रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन तक्रारही करण्यात आली होती. पेरणीचे दिवस असल्याने बियाणे, खते, पेरणीसाठी शेतकºयांना पैशांची तातडीने गरज आहे. असे असताना जिल्हा बँक व राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्हा बँकेकडून माहिती घेतली असता ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाखांचे कर्ज वाटप झाले असून ते त्यांच्या खात्यातही जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.सर्व विकासोंचे तक्ते मंजूरजिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांचे कर्ज तक्ते मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही बँकेच्या सूत्रांनी दिली.राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटपराष्टÑीयकृत बँकांनी मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही खरीप हंगामासाठी १० हजाराचे तातडीचे कर्ज वाटप केले नव्हते. यंदाही राष्टÑीयकृतबँकांकडून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडे दर आठवड्याला याबाबत आढावा बैठक घेतली जात आहे. ४ जून रोजी झालेल्या बैठकीत राष्टÑीयकृत बँकांनी जिल्'ात जेमतेम ३ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या व त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या इशाºयानंतरही राष्टÑीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.