शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

३५ हजार मुलांना जावे लागणार बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : सुट्टी कालावधीतील पोषण आहार वितरणाऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्याचा विचार शासनाने केला आहे. कोविड १९च्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा बंद असल्या, तरी शासनाच्याच आदेशामुळे तालुक्यातील ३५ हजार १९३ विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी जावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे गोंधळणारे आदेश काढण्यात येत असल्याने शिक्षकांसह पालक मुलांच्या संसर्गाच्या भीतीने चिंतेत पडले आहेत.

तिसऱ्या लाटेची भीती आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याने शासनाने किमान १५ ऑगस्टपर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासन विचार करीत असून, राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी २५ जून रोजी आदेश काढून सर्व शालेय पोषण आहारास पात्र लाभार्थ्यांचे १०० टक्के बँक खाते उघडून, त्याची माहिती ९ जुलैपर्यंत जिल्हास्तरावर जतन करून ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

फक्त अमळनेर तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहारासाठी पात्र ३५ हजार १९३ विद्यार्थी आहेत. १ ली - अद्याप प्रवेश नाही

१ ली- ४,०१७ २ री - ४,१९० ३ री- ४,४२७ ४ थी- ४,५६४ ५ वी- ४,६७८ ६ वी- ४,५२५ ७ वी- ४,४३९ ८ वी- ४,३५३

अशी विद्यार्थी संख्या आहे

सध्या डेल्टा प्लस, तसेच कोरोनाच्या भीतीने बँकांमध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने काम सुरू आहे. त्यामुळे बँक कर्मचारी नवीन खाते उघडण्यास टाळाटाळ करतात. फक्त शिष्यवृत्ती घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांची किंवा त्यांच्या पालकांच्या नावाची खाती उघडली आहेत. मात्र, या आदेशात मुलांचीच खाती उघडायची असल्याने अडचणी जास्त आहेत. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची खाती विना डिपॉझिट काढावी लागतात. त्यामुळे त्यांचा नकार मिळतो. त्याचप्रमाणे, खाते क्रमांक किमान ८ ते १० दिवस मिळत नाही. शेतीचे दिवस, पालक कामात व्यस्त असल्याने खाती उघडणे अवघड बाब आहे. शासनाने विद्यार्थ्यांनुसार रक्कम शाळेला देऊन ती जबाबदारी शाळेवर दिल्यास सोयीनुसार वाटप करता येणार आहे.

----

मुलांच्या नावाने खाते उघडायचे, म्हणजे मुलांना बँकेत न्यावे लागेल, त्यामुळे संसर्गाचा धोका आहेच, शासन असे विचित्र निर्णय कसे घेते, त्यापेक्षा शाळा सुरू कराव्यात. - अनिल पाटील, पालक, मंगरुळ

----

सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार साधारणतः दीड महिन्याचा असेल, म्हणजे १ ली ते ५ वीपर्यंत १७९ रुपयांचा तर ६ वी ते ८ वीपर्यंत २६८ रुपयांचा पोषण आहार मिळेल. मात्र, खाती उघडण्यास किमान १०० रुपये लागतील, तर पालकांना परवडेल कसे?

- प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना, अमळनेर

----

शिक्षक १०वीच्या निकालात व्यस्त आहे, खाती उघडण्याची जबाबदारी वर्गशिक्षकवर आल्याने, अनेकदा गरीब मजुरांच्या मुलांना बँकेत घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षकावर येते संसर्ग झाल्यास जबाबदार कोण?

- आर.जे. पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष, शिक्षक भारती संघटना ----

जळगाव

शासनाच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे, योग्य ती काळजी घेऊन प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी.

- आर.डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर