शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:30 AM

जळगाव  जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

ठळक मुद्दे ९०७ जणांविरुद्ध गुन्हे

जळगाव : जिल्ह्यात ४५ पतसंस्थांमध्ये तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी आतापर्यंत ९०७ जणांवर सहकार विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ६५० पतसंस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात विनातारण कर्ज, अनियमितता, गैरव्यवहार आदी कारणांमुळे काही पतसंस्थांची अवस्था अत्यंत बिकट झाली. त्यामुळे ४५ पतसंस्थांमधील ३५१ कोटी ८८ लाखांच्या रक्कमेच्या वसुलीसाठी तब्बल ९०७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार विभागाने २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण २५६६ कर्जदारांकडून २४ कोटी ७४ लाखांची वसुली केली. तसेच याच कालावधीत अडचणीतील पतसंस्थांच्या एकूण १३५६४ ठेवीदारांना २३ कोटी ९३ लाख रक्कमेच्या ठेवींचे वाटप करण्यात आले. मात्र अडकलेल्या ठेवींच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. एकूण अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ७४ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेल्या आहेत. तर १०४ पतसंस्था अजूनही अडचणीत आहेत.पतपेढ्यांमधील घोळाबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांची सहकार कायद्यानुसार चौकशी करणे, मोठ्या कर्जदारांकडून वसुली करणे व वसुली न झाल्यास गुन्हे दाखल करणे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य असले तरीही सहकार विभाग व पतसंस्थांचे संचालक यांच्यात हातमिळवणी होत असल्यानेच कठोर कारवाई होत नसल्याचे आरोप ठेवीदारांकडून होत आहेत.पतसंस्थांमधील घोळ उघडकीस आल्याचे प्रकार घडल्यानंतर प्रशासन सतर्क असून नव्याने काही तक्रार आली तर लगेच टेस्ट आॅडीट केले जाते. मात्र नंतर असे प्रकार झालेले नाहीत. काही पतसंस्था चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.-एम.यु.राठोड, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार