शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:21 IST

२३ गावांना टँकरने तर १० गावांना विहीर अधिग्रहण

ठळक मुद्देडिझेलअभावी टँकर होते बंदगटविकास अधिकारी म्हणतात, पाणीटंचाईवर लक्ष ठेवूनवेळेवर पाऊस न झाल्यास टंचाई वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : तालुक्यात एकूण ३४ गावांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई समस्या उग्र रूप धारण करेल आणि टंचाई गावांच्या संख्येत वाढ होईल, अशी परिस्थिती आहे.आजच्या स्थितीत एकूण ३३ गावांना पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. यात २३ गावांना पाच शासकीय टँकरने आणि उर्वरित ११ गावांना खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.या गावांना सुरू आहे टँकरने पाणीपुरवठाखेडीढोक, मेहू, टेहू, मंगरुळ, वाघरा, वाघरी, सांगवी, पिंपळ भैरव, बाभलेनाग, खोलसर, मोहाडी, पोपटनगर, मोरफळ, हनुमंतखेडे, भोंडण, कंकराज, जिराळी, भोलाणे, वसंतनगर, रामनगर, देवगाव,धाबे, सबगव्हाण या २३ गावांना शासकीय पाच टँकरने बोरी धरणातून भरून त्या त्या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकण्यात येतात.या गावांना झाले विहीर अधिग्रहणवडगाव, अंबापिंप्री, शेळावे, राजवड, लोणी, महालपूर, विटनेर, हिरापूर, भिलाली, वंजारी, पळासखेडे सिम या ११ गावात गावातील खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे.या खेडीढोक, मेहू, मंगरुळ, वाघरे या गावांना दररोज तीन खेपा तर भोंडण गावाला चार खेपा ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकण्यात येतात. गावात टँकर आल्यावर ग्रामस्थ पाणी घेण्यासाठी एकाच गर्दी करतात. विहिरीतून तोलून पाणी काढताना ग्रामस्थांची एकाच दमछाक होते. अनेक गावांना टँकरने होणारा पाणीपुरवठा हा कमी पडत असल्याने शेतातून बैलगाडी सायकलने पाण्याचे ड्रम भरून आणावे लागतात. या आठवडेभरात पावसाचे आगमन न झाल्यास पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. कारण तालुक्यात एकमेव बोरी धरणातून टँकरने पाणी उपसा सुरू आहे. या बोरी धरणातही मृत पाणी साठा शिल्लक आहे. असाच उपसा या बोरीतून सुरू राहिला तर शहराला पाणीटंचाईच्या झळा बसतील यात शंका नाहीडिझेलअभावी टँकर होते बंदपाणीटंचाईची समस्या असलेल्या गावात शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील राजाराम पाटील यांच्या पेट्रोल पंपावरून डिझेल टाकले जात होते. पण डिझेलची थकबाकी थकल्याने टँकरला डिझेल देणे पंपमालकाने बंद केले. डिझेलअभावी पाणीपुरवठा बंद झाला होता. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून डिझेल निधी न आल्याने टँकर जागेवर थांबले होते. मग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अधिकारी नलवाडे यांनी बिलाची जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा मग टँकरला डिझेल देणे सुरू केले आणि या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.तालुक्यात पाणीटंचाई समस्या गंभीर आहे. वेळेवर पावसाचे आगमन झाले नाही तर पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. तरीही मागणीप्रमाणे त्या गावात टँकरने व विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीटंचाई समस्येवर लक्ष ठेवून आहे.-आर.के.गिरासे, गटविकास अधिकारी, पारोळा 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा