शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:21 IST

२३ गावांना टँकरने तर १० गावांना विहीर अधिग्रहण

ठळक मुद्देडिझेलअभावी टँकर होते बंदगटविकास अधिकारी म्हणतात, पाणीटंचाईवर लक्ष ठेवूनवेळेवर पाऊस न झाल्यास टंचाई वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : तालुक्यात एकूण ३४ गावांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई समस्या उग्र रूप धारण करेल आणि टंचाई गावांच्या संख्येत वाढ होईल, अशी परिस्थिती आहे.आजच्या स्थितीत एकूण ३३ गावांना पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. यात २३ गावांना पाच शासकीय टँकरने आणि उर्वरित ११ गावांना खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.या गावांना सुरू आहे टँकरने पाणीपुरवठाखेडीढोक, मेहू, टेहू, मंगरुळ, वाघरा, वाघरी, सांगवी, पिंपळ भैरव, बाभलेनाग, खोलसर, मोहाडी, पोपटनगर, मोरफळ, हनुमंतखेडे, भोंडण, कंकराज, जिराळी, भोलाणे, वसंतनगर, रामनगर, देवगाव,धाबे, सबगव्हाण या २३ गावांना शासकीय पाच टँकरने बोरी धरणातून भरून त्या त्या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकण्यात येतात.या गावांना झाले विहीर अधिग्रहणवडगाव, अंबापिंप्री, शेळावे, राजवड, लोणी, महालपूर, विटनेर, हिरापूर, भिलाली, वंजारी, पळासखेडे सिम या ११ गावात गावातील खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे.या खेडीढोक, मेहू, मंगरुळ, वाघरे या गावांना दररोज तीन खेपा तर भोंडण गावाला चार खेपा ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकण्यात येतात. गावात टँकर आल्यावर ग्रामस्थ पाणी घेण्यासाठी एकाच गर्दी करतात. विहिरीतून तोलून पाणी काढताना ग्रामस्थांची एकाच दमछाक होते. अनेक गावांना टँकरने होणारा पाणीपुरवठा हा कमी पडत असल्याने शेतातून बैलगाडी सायकलने पाण्याचे ड्रम भरून आणावे लागतात. या आठवडेभरात पावसाचे आगमन न झाल्यास पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. कारण तालुक्यात एकमेव बोरी धरणातून टँकरने पाणी उपसा सुरू आहे. या बोरी धरणातही मृत पाणी साठा शिल्लक आहे. असाच उपसा या बोरीतून सुरू राहिला तर शहराला पाणीटंचाईच्या झळा बसतील यात शंका नाहीडिझेलअभावी टँकर होते बंदपाणीटंचाईची समस्या असलेल्या गावात शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील राजाराम पाटील यांच्या पेट्रोल पंपावरून डिझेल टाकले जात होते. पण डिझेलची थकबाकी थकल्याने टँकरला डिझेल देणे पंपमालकाने बंद केले. डिझेलअभावी पाणीपुरवठा बंद झाला होता. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून डिझेल निधी न आल्याने टँकर जागेवर थांबले होते. मग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अधिकारी नलवाडे यांनी बिलाची जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा मग टँकरला डिझेल देणे सुरू केले आणि या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.तालुक्यात पाणीटंचाई समस्या गंभीर आहे. वेळेवर पावसाचे आगमन झाले नाही तर पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करेल. तरीही मागणीप्रमाणे त्या गावात टँकरने व विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीटंचाई समस्येवर लक्ष ठेवून आहे.-आर.के.गिरासे, गटविकास अधिकारी, पारोळा 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा