शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:46 IST

नुकसानीबाबत मुदतीत तक्रार नाही: अजूनही आॅनलाईन तक्रार पाठविण्याची बळीराजाला संधी

जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ३८७ शेतकऱ्यांनीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीकडे दिली आहे.त्यामुळे उर्वरीत ६५ हजार १६ शेतकरी पीकविम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या शेतकºयांना तक्रार करण्याची आणखी एक संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकरी सहभागी झाले होते.त्यासाठी त्यांनी स्वत: १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रूपये तर उर्वरीत हिस्सा केंद्र व राज्य शासनाने भरला होता.त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार १२६ हेक्टरचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता.केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांकडून तक्रारजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास विमा धारकांनी ४८ तासांच्या आत त्याबाबत तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी अथवा विमा कंपनीकडे ई-मेलवर तक्रार करणे बंधनकारक असते. त्यानुसार केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे उर्वरित ६५ हजार १६ शेतकरी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शासना५उ४ी नुकसान भरपाईचा लाभ मात्र मिळू शकेल. दरम्यान गुरूवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उर्वरीत शेतकºयांना नुकसानीची तक्रार देण्याची आणखी एक संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय विमाधारक शेतकरीजळगाव - १९९७भुसावळ - ५३१बोदवड - १९३८यावल - १८८१रावेर - १०८६मुक्ताईनगर- २१४१अमळनेर - २८३६२चोपडा - ८३७७एरंडोल - ३४९२धरणगाव - ६४६६पारोळा - १३२४९चाळीसगाव- ६३५४जामनेर - १८३३३पाचोरा - ४११३भडगाव - ३०८३

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव