शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

६५ हजार शेतकरी राहणार पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:46 IST

नुकसानीबाबत मुदतीत तक्रार नाही: अजूनही आॅनलाईन तक्रार पाठविण्याची बळीराजाला संधी

जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ३८७ शेतकऱ्यांनीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार नियमानुसार ४८ तासांच्या आत कंपनीकडे दिली आहे.त्यामुळे उर्वरीत ६५ हजार १६ शेतकरी पीकविम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या शेतकºयांना तक्रार करण्याची आणखी एक संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकरी सहभागी झाले होते.त्यासाठी त्यांनी स्वत: १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रूपये तर उर्वरीत हिस्सा केंद्र व राज्य शासनाने भरला होता.त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार १२६ हेक्टरचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता.केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांकडून तक्रारजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास विमा धारकांनी ४८ तासांच्या आत त्याबाबत तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी अथवा विमा कंपनीकडे ई-मेलवर तक्रार करणे बंधनकारक असते. त्यानुसार केवळ ३६ हजार ३८७ शेतकºयांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे उर्वरित ६५ हजार १६ शेतकरी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना शासना५उ४ी नुकसान भरपाईचा लाभ मात्र मिळू शकेल. दरम्यान गुरूवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उर्वरीत शेतकºयांना नुकसानीची तक्रार देण्याची आणखी एक संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय विमाधारक शेतकरीजळगाव - १९९७भुसावळ - ५३१बोदवड - १९३८यावल - १८८१रावेर - १०८६मुक्ताईनगर- २१४१अमळनेर - २८३६२चोपडा - ८३७७एरंडोल - ३४९२धरणगाव - ६४६६पारोळा - १३२४९चाळीसगाव- ६३५४जामनेर - १८३३३पाचोरा - ४११३भडगाव - ३०८३

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव