शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

उर्दूच्या २०० शाळांमध्ये २६० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:10 IST

अनास्था : कुठे दोन कुठे तीन शिक्षकांवरच भरतेय शाळा

जळगाव : ढालगाव ता़ जामनेर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ जिल्हाभरात सध्या २०० हून अधिक उर्दू शाळांसाठी ८४१ शिक्षक कार्यरत असून २६० पदे ही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़ त्यामुळे कुठे दोन कुठेत तीन शिक्षकांवरच या शाळांचा कारभार सुरू आहे़ढालगावच्या पालकांना तीन शिक्षकांचे आश्वासन देण्यात आले़ चौथ्या शिक्षकासाठी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे़ जिल्हाभरात शिक्षकच नसल्याने शिक्षक आणणार तरी कोठून असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित केला जात आहे़पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविली जात असून तीही अंतिम टप्प्यात आहेत़ प्राधान्यक्ऱम निवडण्याची प्रक्रिया ३० जून रोजी लॉक झाली असून लवकरच या प्रक्रियेद्वारे शिक्षकांची भरती होऊन रिक्त जागा भरल्या जाणार आहे़ जागा रिक्त त्यात बदली प्रक्रियेत २९ उर्दू शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील उर्दू शाळेत तर २ शिक्षकांवर ५९५ विद्यार्थ्यांची शाळा भरते़ अशी परिस्थिती असताना शैक्षणिक विकास साधणार कसा, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे़आता माहिती घेण्यासाठी धडपडढालगावच्या विद्यार्थ्यांना घेऊन पालकांना शिक्षकांसाठी थेट जिल्हा परिषद गाठावी लागली होती़ तेव्हा शिक्षण विभागाला जाग येऊन त्यांनी शिक्षकांना रूजू होण्याचे आदेश दिले व शिक्षक दुसऱ्या दिवशी रूजू झाले़ त्यानंतर ही शाळा उघडण्यात आली़ बदली प्रक्रियेत किती शिक्षक रूजू झालेले नाही याची माहिती घेण्याची कार्यवाही प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आता हाती घेण्यात आली असून सोमवारपर्यंत यासंदर्भात माहिती समोर येणार आहे.दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची माहितीच नाहीयु-डायस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांसह, शिक्षक व शाळांची माहिती संकलीत करून ती अपलोड केली जाते़ मात्र, २०१७ नंतर जिल्हाभरात जिल्हा परिषद शाळांमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ २०१८ बाबत कुठलीही माहिती विभागाकडे नसून या वर्षाची माहिती अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते १० जूनपर्यंत पूर्ण होणार आहे़ २०१७च्या आकडेवारीनुसार उर्दू माध्यामाच्या २०९ शाळांमध्ये २९ हजार ८१२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव