शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामांतरासाठी २५ वर्षांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:28 IST

बहिणाबार्इंच्या नावासाठी मोर्चा, पदयात्रा, उपोषण

ठळक मुद्देबहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्राकुलगुरुंना निवेदन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रस्ताव मांडण्यासह मोर्चे, पदयात्रा, उपोषण असे आंदोलन करीत मोठा लढा जळगाव जिल्ह्यात देण्यात आला व अखेर विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याने या लढ्याला यश आल्याचा आनंद असल्याचे जिल्हावासीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सर्वच संघटना, सामाजिक, शैक्षणिक पातळीवरून यासाठी पाठपुरावा करण्यात आला.विविध संघटना आल्या एकत्रया मागणीसाठी जळगाव येथे बहिणाबाई स्मारक समिती, लेवा पाटीदार महासंंघ, छावा संघटना, मराठा महासंघ, बंजारा क्रांती इत्यादी संघटनांनी एकत्र येत जळगावात मोर्चा काढला व विद्यापीठास बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली.बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्राराष्ट्रवादी काँग्रेसकडूनही २०११पासून यासाठी लढा सुरू आहे. २०१२मध्ये या मागणीसाठी बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. या सोबतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यासह जिल्ह्यात येणाऱ्या नेत्यास निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवादरम्यानही प्रत्येक मंडळाजवळ मागणीचे फलक लावण्यात येऊन आपला लढा चालूच ठेवला. या मागणीसाठी २० संघटनांसह प्रत्येक पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्षांनी पाठिंबा दिला होता.शिवजयंती सोहळ््यातही मागणीसाधारण १६ ते १७ वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ, सरदार ब्रिगेड यांनी शिवजयंती सोहळ््यादरम्यान ही मागणी केली व नंतर त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.कुलगुरुंना निवेदन१९९८मध्ये विद्यापीठस्तरीय विद्यार्थी परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मनोज दयाराम चौधरी यांनी तत्कालीन कुलगुरु एस.एफ. पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी केली व शासनस्तरावरही पाठपुरावा केला होता.मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.स्मारकाचेही काम मार्गी लागावेबहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक उभारले जात आहे, मात्र सध्या ते थंड बस्त्यात असल्याने हे कामही मार्गी लागावे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. २०११पासून या स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली खरी, मात्र केवळ ४० टक्केच काम झाल्याने काहीशी नाराजी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर यासाठी एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याने काम खोळंबले आहे.वाड्याचाही विकास व्हावाजळगावात बहिणाबाई यांचे वास्तव्य राहिलेला वाडादेखील असून या वाड्यात त्यांच्या वापराच्या वस्तू आहे. या वाड्याचेही जतन केले जावे, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.१९९४मध्येही मागणीविद्यापीठ स्थापनेच्या चारच वर्षानंतर विष्णू भंगाळे, महेश ढाके यांनी ही मागणी केली होती.बºयाच वर्षापासूनची सर्वांचीच ही मागणी होती. यासाठी सर्वच समाजाचे मंडळी पुढे आले. आपल्या सर्वांच्या लढ्याला आज न्याय मिळाल्याने मोठा आनंद आहे. सरकारचे या बद्दल आभार.- विष्णू भंगाळे, सिनेट सदस्य.आमच्या लढ्याला अखेर यश आले असून विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव मिळाल्याचा मोठा आनंद आहे.- विनोद देशमुख.खान्देशकन्येच्या नावाने आता विद्यापीठ ओळखले जाणार असल्याने याचा असोदेकर मंडळींसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.- किशोर चौधरी, असोदा.बहिणाबाई चौधरी यांचा उर्जास्त्रोत नवीन पिढीलाही मिळावा, यासाठी आपला प्रयत्न होता. त्यास यश आल्याचा आनंद आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथराव खडसे यांचे आभार.- मुविकोराज कोल्हे.या लढ्यात सर्वांनी पुढाकार घेत एकमुखी मागणी केल्याने हे सर्वांचे यश म्हणावे लागेल.- मनोज दयाराम चौधरी, संस्थापक अध्यक्ष सरदार ब्रिगेड.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ