शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला २५ एकर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : नशिराबाद ते जळगाव दरम्यान महामार्गाला लागून असलेल्या २५ एकर शेतात पावसाचे पाणी साचले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद : नशिराबाद ते जळगाव दरम्यान महामार्गाला लागून असलेल्या २५ एकर शेतात पावसाचे पाणी साचले असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात मुख्य नाल्याचा प्रवाह बदलवून १०० फूट लांब नव्याने नाल्याची आखणी केल्यामुळे परिसरातील शेतांमध्ये हे पाणी साचले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांचे नुकसान होण्यासह या पाण्यामुळे महामार्गाचा काही भागदेखील खचला असून यामुळे वाहतुकीलादेखील धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगावकडे जाताना महामार्गावर नशिराबादजवळ नाला ज्या दिशेने वाहत होता त्याच्या प्रवाहाची दिशा बदलून १०० फूट लांब नवीन नाल्याची आखणी केल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे २५ एकर शेतात पाणी साचले असून महामार्गाचा भागही खचला आहे.

पिकांसाठी प्रतीक्षा असलेल्या पावसानेच होत्याचे केले नव्हते

गेल्या दोन वर्षांपासून अतिपावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यात यंदा पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यात सोमवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिकाला जीवदान मिळण्याची अपेक्षा असताना याच पाण्याने होत्याचे नव्हते केल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या शेतकऱ्यांना बसला फटका

राजू रेहदासनी, प्रल्हाद पाटील, रमणलाल भावसार, मधुकर खुंटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. यामुळे शेतामधील सोयाबीन, उडीद व इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाहतुकीला धोका

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने काम करताना नाल्याची दिशा बदलल्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्यासह महामार्गाच्या कामालादेखील बसत आहे. पाण्यामुळे आता केवळ काही भाग खचला असून याहीपेक्षा जास्त व सलग पाऊस झाल्यास महामार्गावर पाणी येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्यामुळे वाहतुकीलादेखील धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी खचलेला रस्ता न दिसल्यास अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.

खचलेल्या रस्त्याची तसेच शेतातील नुकसानीची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष जनार्दन माळी, विनायक धर्माधिकारी यांनी पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते.

नुकसान भरपाई द्या पंचनामे करायामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून नाल्याचा प्रवाह बदलल्यानेच हे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पेरणी व यंदाचा हंगाम हातातून गेला. महामार्ग प्राधिकरण विभागाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपाध्यक्ष लालचंद पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे.

‘लोकमत’ने या पूर्वीच वर्तविला होता अंदाज

महामार्गाचे काम पाहता ‘महामार्गावर पाणी तुंबण्याचा धोका?’ या मथळ्याखाली लोकमतने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. तसेच भविष्यात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन होईल, अशी ओरड शेतकरी अगोदर पासूनच करीत होते, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष झाले व पहिल्याच दमदार पावसात शेतात पाणी साचण्यासह महामार्गाचेही नुकसान झाले आहे.

नाला कसा वळविला त्याचा आराखडा कसा मंजूर केला हे पहावे लागेल. तसेच स्थानिक अधिकार्यांना त्याबाबत कळवून पाहणी करणार आहे. : ओंकार चांडक, कार्यकारी अभियंता, न्हाई.