शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा २०० कोटींचा गरैव्यवहार- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:16 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली.

कुंदन पाटील

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी जिल्ह्यात सुमारे २०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे. तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत सोनवणे दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वीच जिल्ह्यातील मंत्र्यांकडून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, निरीक्षक प्रसेनजित पाटील उपस्थित होते. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत खडसेंकडून एक हजार कोटींचे कामांमध्ये अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या निषेधाचा ठराव मांडला होता. त्याला प्रत्युत्तर देताना खडसे बोलत होते. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांची राज्य शासनासमोर ‘पत’ नाही. म्हणूनच शासकीय ठेकेदारांचे ३०० कोटींचे बिले शिल्लक आहे. या तीनही मंत्र्यांची पत असेल तर त्यांनी ठेकेदारांचे तीनशे कोटी आणून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.

सोनवणेंवर गंभीर आरोप

अधीक्षक अभियंता सोनवणे यांच्याविरोधात अनेक पुरावे देत खडसेंनी गंभीर आरोप केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्ला घेण्यासाठी सोनवणेंनी ६ कोटींचा निधी काढला. शासकीय अधिकारी असतानाही कुठल्या आधारावर व केवळ तांत्रिक सल्ल्यासाठी ६ कोटींचा निधी खर्च केला, याविषयी तक्रार केली आहे. तसेच विधीमंडळात लक्ष्यवेधी मांडल्यावर संबंधित मंत्रीही उत्तर द्यायला सामोरे येत नाही. सोनवणेंनी शासकीय रकमेतून ३ महागड्या गाड्या नियमाला चिरडून खरेदी केल्या. या गाड्या कोण वापरतय, हेदेखिल तपासण्याची गरज आहे. १४ वर्षांपासून जळगावात सेवारत असणाऱ्या सोनवणेंनी नाशिक व जळगाव या दोन्ही पदांवर सेवारत राहून पगार उकळला आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे सा.बा.विभागाकडून केले जात आहेत. त्यासाठी मंत्र्यांचे, काही आमदारांचे नातेवाईक, समर्थक ठेकेदारांचीच सोय केली जात आहे. सोनवणेंची बदली होऊनही त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण देऊन जळगावातच ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोद्रीचा हिशोब का देत नाहीत?

गोद्री येथे पार पडलेल्या ‘महाकुंभ’चा वारंवार खर्च मागूनही दिला जात नाही. या महाकुंभच्या नावाखाली आचारसंहिता असतानाही कुणाच्या परवानगीने हा निधी खर्च केला गेला, असा सवाल खडसेंनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसे