शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१७६ कोटींचा प्रलंबित मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, पूर यामुळे झालेल्या नुकसानीचे ७४ कोटी ८८ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, पूर यामुळे झालेल्या नुकसानीचे ७४ कोटी ८८ लाख रुपये तर २०१७ पासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानभरपाईचे प्रलंबित १०२ कोटी ९ लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले.

जानेवारी ते सप्टेंबर २०२१ मध्ये ३ कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातील ६७ कोटी ५७ लाख रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यंदा घरांची पडझड, पशुहानी यासाठीचे ७ कोटी ३१ लाखांची मदतही प्रलंबित आहे.

यासोबतच २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर बोंडअळींमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यातील ११ कोटी ७० लाख रुपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील दुष्काळाच्या मदतीतील ५० कोटी ७३ लाखांची मदत अद्याप बाकी आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीपैकी ४ कोटी ३३ लाख रुपयांची मदत बाकी आहे.

जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ३५ कोटी ३१ लाख रुपयांची मदत अजून बाकी आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यास हा निधी देण्याचे निर्देश दिले.