शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

टिटवी येथील दीडशे वर्षांची रामलीला परंपरा प्रथमच होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:18 IST

टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. परंतु कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे प्रथमच पडणार खंडजुने, वृद्ध कलानंत आजही सादर करतात कलावंत

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी बळीराम पांडू पाटील व भीमजी बाबा यांनी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. यातून समाज प्रबोधनही करण्यात येत होते. ही लोककला आजतागायत अखंड सुरू होती. परंतु जगभर कोरोनाचे तांडव सुरू असल्यामुळे या परंपरेला खंड पडला आहे.जुन्या काळी ग्रामीण भागात मनोरंजनाची साधने नसल्यामुळे ग्रामीण भागात रामलीला, महाभारत, शिवाजी महाराज यांच्या शौर्य कथा अशा अनेक कथा हुभेहुभ सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन करायचे. कालांतराने मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे व दूरदर्शनवर रामायण, महाभारत कथा प्रसारित झाल्यामुळे अनेक गावात या जिवंत कलेकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे ही लोककला लोप पावली आहे.परंतु पारोळा तालुक्यातील टिटवी गाव अपवाद आहे. येथील मधुकर केशव पाटील, मधू न्हावी, शांताराम पाटील या वृद्ध कलावंतांनी आजपर्यंत ही कला तरुणांच्या माध्यमाने जिवंत ठेवली आहे. आजही गावातील कलावंत आपल्या भूमिका हुभेहुभ सादर करतात व श्रोत्यांना रात्रभर खिळवून ठेवतात. त्यात मारोती-उदय पाटील, राम-छोटू महाजन, लक्ष्मण-राजेंद्र पाटील, सीता- जितू पाटील, रावण-सुधाकर महाजन असे अनेक कलावंत पूर्ण रामायण, महाभारत कथांच्या भूमिका विज्ञान युगातही सदर करतात. विशेष म्हणजे हे खेडूत कलावंत कुठे प्रशिक्षण न घेता ही कला सदर करतात.कलाकारांची ही कला पाहण्यासाठी बाहेरगावी कामानिमित्त गेलेले व नातेवाईक व परिसरातील श्रोतेही मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचे. मात्र दीडशे वर्षांची ही परंपरा ‘कोरोना’मुळे खंडित होणार आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव