शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जळगाव जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणारे दीड लाख शेतकरी झाले थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:05 IST

कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा

ठळक मुद्देजिल्हा बँकेचे थकविले १२०० कोटीकर्जवसुली ठप्प

सुशील देवकरजळगाव : शासनाकडून कर्जमाफीच्या योजनेत सातत्याने बदल करणे सुरूच असल्याने नियमित कर्ज फेडल्याने या योजनेचा लाभ मिळू न शकलेले सुमारे दीड लाख शेतकरी योजनेच्या निकषात आणखी बदल होऊन लाभ मिळेल, या आशेने थकबाकीदार झाले आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तब्बल १२०० कोटी रूपये थकविले आहेत. यास जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दुजोरा दिला.राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा करून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत ज्या शेतकºयांना कर्जवाटप झाले व जे ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार ठरले. ज्यांचे कर्ज ३१ जुलै २०१७ पर्यंत भरलेले नाही. ते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र याचवेळी ज्या शेतकºयांना १ एप्रिल २०१६ नंतर कर्जवाटप झाले ते मात्र या कर्जमाफीसाठी पात्र झाले नाहीत. त्यांची कर्जभरण्याची अंतीम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. तर ज्यांना १ एप्रिल २०१७ नंतर कर्जवाटप झाले. त्यांना कर्जफेडीसाठीची अंतीम मुदत ही ३१ मार्च २०१८ ची होती. मात्र या मुदतीपर्यंतही आधीच्याच कर्जमाफी योजनेचा घोळ सुरू असल्याने व निकषांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने नियमित कर्ज भरल्याने या योजनेचा लाभ न मिळालेल्या या शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या. त्यांनीही नियमित कर्जफेडीचा आगाऊ पणा न करता थकबाकी ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे.अजूनही वर्षभर चालणार घोळकर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे या योजनेचा घोळ आणखी वर्षभर चालण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.कर्जवसुली ठप्पजिल्हा बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दीड लाख शेतकºयांनी जिल्हा बँकेचे १२०० कोटी रूपये थकविले आहेत. त्यामुळे कर्जवसुली ठप्प झाली आहे.योजनेतील बदलांबाबतही प्रश्नचिन्हशासनाने कर्जमाफी योजनेत बदल केले असून पूर्वी घरटी एक लाभार्थी ग्राह्यधरून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती. ती सरसकट सर्व अर्जदारांना करण्याचा बदल केला. मात्र योजनेच्या निकषांनुसार अनेक कुटुंबातील अन्य सदस्यांनी कर्जमाफी योजनेला कुटुंबातील एकच सदस्य पात्र असल्याने बाकीच्या सदस्यांनी अर्जच भरलेले नव्हते. त्यांचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शासन त्याबाबत काय भूमिका घेते? याबाबतही उत्सुकता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव