शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणारे दीड लाख शेतकरी झाले थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:05 IST

कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा

ठळक मुद्देजिल्हा बँकेचे थकविले १२०० कोटीकर्जवसुली ठप्प

सुशील देवकरजळगाव : शासनाकडून कर्जमाफीच्या योजनेत सातत्याने बदल करणे सुरूच असल्याने नियमित कर्ज फेडल्याने या योजनेचा लाभ मिळू न शकलेले सुमारे दीड लाख शेतकरी योजनेच्या निकषात आणखी बदल होऊन लाभ मिळेल, या आशेने थकबाकीदार झाले आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तब्बल १२०० कोटी रूपये थकविले आहेत. यास जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दुजोरा दिला.राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा करून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत ज्या शेतकºयांना कर्जवाटप झाले व जे ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार ठरले. ज्यांचे कर्ज ३१ जुलै २०१७ पर्यंत भरलेले नाही. ते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र याचवेळी ज्या शेतकºयांना १ एप्रिल २०१६ नंतर कर्जवाटप झाले ते मात्र या कर्जमाफीसाठी पात्र झाले नाहीत. त्यांची कर्जभरण्याची अंतीम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. तर ज्यांना १ एप्रिल २०१७ नंतर कर्जवाटप झाले. त्यांना कर्जफेडीसाठीची अंतीम मुदत ही ३१ मार्च २०१८ ची होती. मात्र या मुदतीपर्यंतही आधीच्याच कर्जमाफी योजनेचा घोळ सुरू असल्याने व निकषांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने नियमित कर्ज भरल्याने या योजनेचा लाभ न मिळालेल्या या शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या. त्यांनीही नियमित कर्जफेडीचा आगाऊ पणा न करता थकबाकी ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे.अजूनही वर्षभर चालणार घोळकर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे या योजनेचा घोळ आणखी वर्षभर चालण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.कर्जवसुली ठप्पजिल्हा बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दीड लाख शेतकºयांनी जिल्हा बँकेचे १२०० कोटी रूपये थकविले आहेत. त्यामुळे कर्जवसुली ठप्प झाली आहे.योजनेतील बदलांबाबतही प्रश्नचिन्हशासनाने कर्जमाफी योजनेत बदल केले असून पूर्वी घरटी एक लाभार्थी ग्राह्यधरून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती. ती सरसकट सर्व अर्जदारांना करण्याचा बदल केला. मात्र योजनेच्या निकषांनुसार अनेक कुटुंबातील अन्य सदस्यांनी कर्जमाफी योजनेला कुटुंबातील एकच सदस्य पात्र असल्याने बाकीच्या सदस्यांनी अर्जच भरलेले नव्हते. त्यांचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शासन त्याबाबत काय भूमिका घेते? याबाबतही उत्सुकता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव