शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:06 IST

मुख्यकार्यकारी अधिकाºयांची माहिती

ठळक मुद्देआरोग्यासह इतर विभागासाठी निधीची केली होती मागणी२०१८-१९ या वषार्साठी निधी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचा भरीव निधी देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल तसेच दुरुस्तीसाठी करोडोच्या निधीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शासनाकडून १५ कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शासनानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे विभागीय कार्यालयात जि.प.च्या अधिकाºयांची बैठक झाली, त्यावेळी आरोग्यासह इतर विभागासाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार मिळणारा १५ कोटींचा निधी मिळणार असल्याने २०१८-१९ या वषार्साठी हा निधी राहणार आहे.मागील वर्षाच्या तुलनेत आरोग्य विभागासाठीच्या निधीत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आरोग्यासाठी केवळ ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यावर्षी १५ कोटी रुपये मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे.ग्रामीण रस्ते व शहरी रस्त्याच्या एकूण १०३ कामांसाठी १९ कोटींच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील २८ तर शहरी भागातील ७५ कामे होणार आहे. कामास प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठीदेखील साडेचार कोटींची तर अंगणवाडी बांधकामासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा अद्याप हगणदारी मुक्त झालेले नसल्याने शौचालयासाठी नव्याने ७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नुकतीच दिल्ली येथे सचिांसोबत बैठक झाली. यावेळी दिवेगावकर यांनी शौचालयासाठी ७५ कोटींची नव्याने मागणी केली होती. ६ मे रोजी केवळ १७ हजार ६०० फोटो अपलोडींग झाले होते. यात वाढ झाली असून सद्यस्थितीत १ लाख ६९ हजार फोटो अपलोड झाले असल्याने दिल्ली येथे सचिवांनी समाधान व्यक्त केल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले. १० महिन्यात ५ तालुके पूर्णत: हगणदारीमुक्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद