शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

मनपाच्या कोविड केअर सेंटर मध्ये १३०० बेड खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

शहरातील एकूण ॲक्टिव रूग्ण - २५३५ कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ३९० घरीच राहून उपचार ...

शहरातील एकूण ॲक्टिव रूग्ण - २५३५

कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ३९०

घरीच राहून उपचार घेत असलेले रुग्ण - ५५६

खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - ५०० सुमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामध्ये कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, अशा रुग्णांवर महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर मध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत. महापालिकेने या ठिकाणी एकूण १७०० बेडची व्यवस्था केली असली तरी या ठिकाणी सद्य स्थितीत केवळ ३९० रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तर १३०० हून अधिक बेड याठिकाणी खाली पडले आहेत. शहरात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांकडून मनपाच्या कोविड केअर सेंटरपेक्षा गृह विलगीकरणला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

मे २०२० पासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयात कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना व त्यांच्या संपर्कातील संशयितांना देखील काही दिवस क्वारंटाईन केले जात होते. मात्र, मनपा प्रशासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये केवळ कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनाच ठेवले जात आहे. मात्र रुग्णांचा संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध महापालिका प्रशासनाकडून या टप्प्यात फारसा घेतला जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान , महापालिकेने कोविड केअर सेंटर मध्ये व्यवस्था केली असली तरी अनेक रुग्ण या ठिकाणी न थांबता घरीच राहून उपचार करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटर मधील तब्बल १३०० हून बेड अद्यापही खाली आहेत.

गृह विलगीकरणतील रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेचे पथक कार्यान्वित

शहरात ५५० हून अधिक रुग्ण सद्यस्थितीत घरीच राहून उपचार करून घेत आहेत. मात्र हे रुग्ण घरीच थांबून आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी महापालिकेत प्रशासनाची आहे. यासाठी महापालिकेने आरोग्य विभागांतर्गत काही पथके नेमली आहेत. मात्र आतापर्यंत या पथकांकडून गृह विलगीकरण च्या नियमांची पायमल्ली करण्याबाबत कोणत्याही रुग्णावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच मनपा वैद्यकीय विभागाचा पथकाकडून गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांचा घरी जाऊन दररोज त्या रुग्णांच्या तब्येतीविषयी तपासणी केली जात असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी '' लोकमत ''ला दिली.

मानसिक आधार मिळण्यासाठी रुग्णांचे होम आयसोलेशन ला प्राधान्य

कोरोना काळात रुग्णांना मानसिक धीर देखील मिळणे महत्त्वाचे आहे. शहरात झालेल्या अनेक मृत्यूबाबत अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मृत्यू ओढवला असल्याचे कारण देखील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून पुढे केले जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसरा लाटेत अनेक रुग्ण की ज्यांना कमी लक्षणे आहेत असे रुग्ण महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये थांबणे ऐवजी घरीच राहून उपचार घेण्यात प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे घरातील ज्या सदस्यांना कोरोना चा संसर्ग झालेला नाही अशा सदस्यांना देखील कोरोना चा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहा दिवस घरीच थांबणे महत्वाचे

एखादा रुग्ण कोरोना बाधित झाल्यानंतर संबंधित रुग्णाला कमी लक्षणे असतील व संबंधित रुग्ण घरीच राहून उपचार करत असते तर त्या रुग्णाला दहा दिवस घरीच थांबणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत शहरात १५०० हून अधिक रुग्ण घरी राहून उपचार घेत असले तरी त्यापैकी १ हजारहून अधिक रुग्णांचा दहा दिवसांचा काळ संपल्यामुळे या रुग्णांचा ॲक्टिव रूग्णांमध्ये समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत शहरात ५५६ रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. तसेच दिवसाला ४० हून अधिक रुग्णांचा घरीच राहून उपचार घेण्याबाबतचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त होत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.