शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

भुसावळातील १२५ कि.मी. रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 9:57 PM

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे रस्त्यावरून चालणे झाले मुश्किलपालिकेचे रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष शहरवासीय संतत्प

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस असल्यामुळे या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील १२५ किलोमीटर रस्त्यांचे भाग्य कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. अमृत योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे करू नये, असा आदेश शासनाने पालिकेला दिला आहे. ह्या आदेशाचे कारण पुढे करून पालिका रस्त्यांच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शहरातील यावल-जळगाव व वरणगाव रस्ता सोडला तर एकाही रस्त्याची स्थिती चांगली राहिली नाही. यावल-जळगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, तर वरणगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांची स्थिती सोडली तर तब्बल ११५ किलोमीटर रस्ते उद्ध््वस्त झाले आहेत. जामनेर रस्ता मुख्य रस्ता म्हणून गणला जातो. मात्र या रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे.जे काम झाले तेही निकृष्टदरम्यान, पालिकेतर्फे गेल्यावर्षी मामाजी टॉकीज ते पांडुरंग टॉकीजपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले होते. ट्रीमिक्स पद्धतीने बनविण्यात आलेला हा रस्ता आहे. रस्त्याचे काम होताच त्यावेळी महिनाभरात उद्ध्वस्त झाला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम म्हणून या रस्त्याची गणना झाली होती. पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन या रस्त्याचे काम पुन्हा करून घेतले होते.शहरात १२५ किलोमीटर रस्तेशहरात सुमारे १२५ किलोमीटर थांब रस्त्ये असल्याचा अंदाज आहे. यातील यावल - जळगाव हा पाच ते सात किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला आहे. तर भुसावळ आगारापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा वरणगाव रस्ता पालिकेने केला आहे. अवघे १० किलोमीटर रस्ते वगळले तर सर्वच रस्त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.१५ लाखांचा मुरुम गेला खड्ड्यातगेल्या वर्षी या रस्त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे पालिकेने तक्रारीचा फायदा घेऊन १५ ते २० लाख रुपयांचा मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा निर्माण केला होता. त्यावेळी 'डांबरी रस्त्याला, मुरमाचे ठिगळ' लावल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अधिकच कठीण झाले होते.माजी आमदारांनीही केला होता रस्ता रोकोदरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांनी ८ जानेवारी रोजी यावल-जळगाव रस्त्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्त्यांच्या कामांसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन चालले होते. यावेळी सात दिवसात रस्त्यांची कामे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती, तर तहसीलदार महेंद्र देवरे यांना तेरा मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र तरीही पालिकेने दुर्लक्ष केले.पावसाळा संपताच रस्त्यांची कामे सुरू होणार -नगराध्यक्षअमृत योजनेमुळे रस्त्यांची कामे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता अमृत योजनेचे काम बºयाच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपताच शहरातील काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली आहे. यासाठी पाच कोटी रुपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ