शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दोन दिवसांची मुदत

ठळक मुद्दे किती क्लेम प्रोसेस केले माहिती मिळेनाबँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकºयांकडून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांच्या पीककर्जातून कपात केलेल्या रक्कमेपैकी १२ कोटी रूपयांच्या रक्कमेबाबत घोळ आहे. जिल्हा बँकेकडून ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीला ही रक्कम भरण्यासोबत माहितीही वेळेवर भरली असल्याचा दावा केला जात असून कंपनीकडून मात्र या रक्कमेतून किती शेतकºयांचे क्लेम प्रोसेस केले? याची माहिती मिळत नसल्याचे हा घोळ निर्माण झाला आहे.सोमवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत हा विषय समोर आल्याने जिल्हाधिकाºयांनी जिल्हा बँक व विमा कंपनीला याबाबत शहानिशा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यात २०१७ मध्ये खरीप हंगामात एकूण ८५ हजार ५७८ शेतकºयांचा ११ कोटी ३९ लाख ७७ हजार ५९२ हेक्टर क्षेत्राचा ४५३ कोटी ४८ लाख ९३ हजार ५६६ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी शेतकºयांनी १६ कोटी ३३ लाख २९ हजार ६२३ रूपयांचा विमा हफ्ता भरला होता. तर रब्बी हंगामात ४ लाख ४१ हजार ८०२ रूपयांचा हफ्ता भरला होता. मात्र विमा कंपनीकडून आलेल्या याद्यांमध्ये अनेक गावांमधील शेतकºयांची नावेच वगळली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तर अनेक शेतकºयांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ पुरेसा मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा बँक उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे तसेच विमा कंपनीविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता. अशाच काही तक्रारींबाबत सोमवार, ९ जुलै रोजी झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यात १२ कोटींच्या रक्कमेबाबत घोळ असल्याचे आढळून आले आहे.याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने पीकविम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमियम) शेतकºयांकडून १२ कोटी रूपये गोळा केले. ते भरणा केले. मात्र ओरिएंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार जिल्हा बँकेने त्याबाबत आॅनलाईन माहितीचा भरणा ३१ जुलै २०१७ पर्यंत करणे आवश्यक असताना तो केलेला नाही. तर माहितीचा भरणा वेळेवर केला असल्याचे जिल्हा बँकेचे म्हणणे आहे. बँकेच्या माहितीवर विमा कंपनीने प्रोसेस केली की नाही? किती खातेदारांच्या माहितीवर प्रोसेस केली व किती खातेदारांच्या माहितीवर केली नाही? याची शहानिशा होत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. प्रोसेस केलेली नसेल तर फौजदारी कारवाई केली जाईल.बँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावाजिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने २०१७ च्या हंगामात ७२ हजार शेतकºयांचे विमा हप्त्याचे १२ कोटी रूपये विमा कंपनीला (ओरिएंटल इन्शुरन्स) मुदतीत पाठविले आहेत. माहितीही मुदतीत पाठविली आहे. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. विमा कंपनीकडूनच घोळ झाला आहे. कंपनीने पाठविलेल्या पहिल्या यादीत शेतकºयांची नावे होती ती दुसºया यादी नाहीत. त्याचे उत्तर कंपनी देऊ शकत नाही. पैसे भरलेले असल्याने विमा देणे (नुकसान भरपाई) कंपनीची जबाबदारी आहे.विमा कंपनीकडून २० कोटीची भरपाई२०१७च्या खरीप हंगामातील जिल्हा बँकेच्या सभासद १७ हजार ४१० शेतकºयांना विमा कंपनीकडून फक्त १९ कोटी ९० लाख ५९ हजाराची भरपाई मिळाली आहे. त्यापैकी १६ हजार १२० सभासदांच्या नावावर १९ कोटी ८ लाख ३३ हजरांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाJalgaonजळगाव