शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दोन दिवसांची मुदत

ठळक मुद्दे किती क्लेम प्रोसेस केले माहिती मिळेनाबँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकºयांकडून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांच्या पीककर्जातून कपात केलेल्या रक्कमेपैकी १२ कोटी रूपयांच्या रक्कमेबाबत घोळ आहे. जिल्हा बँकेकडून ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीला ही रक्कम भरण्यासोबत माहितीही वेळेवर भरली असल्याचा दावा केला जात असून कंपनीकडून मात्र या रक्कमेतून किती शेतकºयांचे क्लेम प्रोसेस केले? याची माहिती मिळत नसल्याचे हा घोळ निर्माण झाला आहे.सोमवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत हा विषय समोर आल्याने जिल्हाधिकाºयांनी जिल्हा बँक व विमा कंपनीला याबाबत शहानिशा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यात २०१७ मध्ये खरीप हंगामात एकूण ८५ हजार ५७८ शेतकºयांचा ११ कोटी ३९ लाख ७७ हजार ५९२ हेक्टर क्षेत्राचा ४५३ कोटी ४८ लाख ९३ हजार ५६६ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी शेतकºयांनी १६ कोटी ३३ लाख २९ हजार ६२३ रूपयांचा विमा हफ्ता भरला होता. तर रब्बी हंगामात ४ लाख ४१ हजार ८०२ रूपयांचा हफ्ता भरला होता. मात्र विमा कंपनीकडून आलेल्या याद्यांमध्ये अनेक गावांमधील शेतकºयांची नावेच वगळली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तर अनेक शेतकºयांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ पुरेसा मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा बँक उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे तसेच विमा कंपनीविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता. अशाच काही तक्रारींबाबत सोमवार, ९ जुलै रोजी झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यात १२ कोटींच्या रक्कमेबाबत घोळ असल्याचे आढळून आले आहे.याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने पीकविम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमियम) शेतकºयांकडून १२ कोटी रूपये गोळा केले. ते भरणा केले. मात्र ओरिएंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार जिल्हा बँकेने त्याबाबत आॅनलाईन माहितीचा भरणा ३१ जुलै २०१७ पर्यंत करणे आवश्यक असताना तो केलेला नाही. तर माहितीचा भरणा वेळेवर केला असल्याचे जिल्हा बँकेचे म्हणणे आहे. बँकेच्या माहितीवर विमा कंपनीने प्रोसेस केली की नाही? किती खातेदारांच्या माहितीवर प्रोसेस केली व किती खातेदारांच्या माहितीवर केली नाही? याची शहानिशा होत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. प्रोसेस केलेली नसेल तर फौजदारी कारवाई केली जाईल.बँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावाजिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने २०१७ च्या हंगामात ७२ हजार शेतकºयांचे विमा हप्त्याचे १२ कोटी रूपये विमा कंपनीला (ओरिएंटल इन्शुरन्स) मुदतीत पाठविले आहेत. माहितीही मुदतीत पाठविली आहे. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. विमा कंपनीकडूनच घोळ झाला आहे. कंपनीने पाठविलेल्या पहिल्या यादीत शेतकºयांची नावे होती ती दुसºया यादी नाहीत. त्याचे उत्तर कंपनी देऊ शकत नाही. पैसे भरलेले असल्याने विमा देणे (नुकसान भरपाई) कंपनीची जबाबदारी आहे.विमा कंपनीकडून २० कोटीची भरपाई२०१७च्या खरीप हंगामातील जिल्हा बँकेच्या सभासद १७ हजार ४१० शेतकºयांना विमा कंपनीकडून फक्त १९ कोटी ९० लाख ५९ हजाराची भरपाई मिळाली आहे. त्यापैकी १६ हजार १२० सभासदांच्या नावावर १९ कोटी ८ लाख ३३ हजरांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाJalgaonजळगाव