शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सभेत दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:30 IST

सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात आठही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आतापासून पिण्याचे पाणी, जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने काय तयारी केली. यावरुन सर्व सदस्यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.या सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु, सदस्य जयमंगल जाधव यांनी याला विरोध केला. ते म्हणाले की, जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तो पर्यंत कुठलाही ठराव संमत करता येणार नाही.यानंतर त्यांनी पाणी टंचाई संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, घनसावंगी तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरीही अधिकाºयांनी या गावांमध्ये पाण्याचे टँकर पाठवले नाहीत. जिल्ह्यात सध्या फक्त ३५ टँकर चालू आहे. ज्या गावांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्वरित टँकर का दिले जात नाही. त्याचबरोबर कृती आराखडा तयार करतांना कोणत्याही अधिकाºयाने संबंधित सदस्यांना विचारात घेतले नसल्यानेच आज काही गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सर्व सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. या मुद्यावरुन मोठा गोंधळ उडाला.यावर उत्तर देताना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, १२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. आपण सदस्यांना विचारात घेऊन पुन्हा टँकरची मागणी जिल्हाधिका-यांकडे करु. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये ज्या गावांना टँकरची गरज आहे. त्यांना त्वरीत टँकर उपलब्ध करुन देण्यात येईल.सभेत दुष्काळी नियोजनांचा मुद्दा अनेक सदस्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह््यात दुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह््यात आढावा बैठक घेतली. कृषी व पशु संवर्धन अधिकाºयांना उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. परंतु, अधिका-यांनी अद्यापही काहीच केले नाही. सध्या आपल्याला पाणी, हाताला काम, जनावरांच्या चा-यांचा प्रश्न यावर त्वरित उपाय योजना करण्याची गरज आहे. अधिका-यांनी येत्या आठ दिवसांत उपाय योजना करुन दुष्काळाला तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व अधिकारी सदस्यांना वेळ देत नसल्याच्या मुद्यावरुन भाजप सदस्य आक्रमक झाले. सदस्य अवधुत खडके हे मुख्य कार्यकारी अधिका-यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, सीईओंनी त्यांची भेट घेतली नाही. आम्ही सर्वसामान्याच्या कामासाठी ग्रामीण भागातून येतो. परंतु, एकही अधिकारी भेटत नाही. त्यामुळे सदस्यांनी कोणाला भेटायचे ? असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी उपस्थित केला. यावरुन सभेत मोठा गोंधळ झाला.अधिकारी, सदस्यांमध्ये वादावादीपरतूर पंचायत समितीच्या सभापती शीतल तनपुरे यांचे पती हे उपमुख्य अधिकारी अशोक खरात यांच्याकडे प्रशासकीय कामकाजासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी चुकीच्या पध्दतीने वागणूक दिल्याचा आरोप शीतल तनपुरे यांनी केला. यावरून जि.प. सदस्य महेंद्र पवार यांनी आक्रमक होत खरात यांना धारेवर धरून त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदdroughtदुष्काळ