शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

झीरो पेंडन्सी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:52 IST

झीरो पेंडन्सीच्या नावाखाली प्रशासनाकडून निव्वळ पसारा आवरण्याचे काम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या धोरणानुसार तक्रार आणि विकास कामांच्या संचिका एका टेबलावर आठ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित न ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, झीरो पेंडन्सीच्या नावाखाली प्रशासनाकडून निव्वळ पसारा आवरण्याचे काम होत आहे. येथील पंचायत समिती, तहसील कार्यालयातील विविध विभागात तक्रारींचा निपटारा होण्यास विलंब होत असल्याची नागरिकातून ओरड होत आहे.प्रलंबित कामांचा निपटारा तात्काळ व्हावा, कामाच्या आवश्यक दस्तऐवजात सुसूत्रता यावी यासाठी शासनाने सर्व कार्यालयात झिरो पेडन्सी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. पंचायत समिती, तहसील कार्यालयात अभियान जोरदार राबविण्यात आले. परंतु काही दिवस सुरळीत कामे करण्यात आल्यानंतर तक्रारीचा पाऊस कायमच आहे. यामुळे हे अभियान केवळ पसारा आवरण्याचा प्रकार असल्याचे विविध कामानिमीत्त कार्यालयात येणारे नागरिक सांगत आाहेत.मोहिमेचा फज्जा : नागरिक वैतागलेवस्तूत: ही मोहीम जुन्या दस्तऐवजांचे गठ्ठे बांधण्यापलीकडे गेली नाही. तीस वर्ष, दहा वर्ष आणि पाच वर्षाच्या विकास कामांचे तपशील हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या कापडात बांधण्यात आले आहे.मुळ तक्रारी मात्र, एकाच टेबलावर ‘जैसे थे’ आहेत. रमाई घरकुल आवास योजना असो, शिक्षण, तसेच पुरवठा विभाग, महसूल विभागात पूर्णवेळ तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातून तक्रारी घेऊन आलेल्या अनेकांना वारंवार तहसील, पंचायत समिती कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तालुक्यातील १२२ गावात सुरु असलेल्या घरकुल योजनांच्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या वर्षीच्या अनुदानासाठी चकरा माराव्या लागत आहेत. तर अनेकांचे दुष्काळी अनुदान तसेच विविध कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समितीRevenue Departmentमहसूल विभागTahasildarतहसीलदार