शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:56 IST

महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील गुरूगणेश भवनमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केल. आजपर्यंत आपण केवळ चुकीच्या मुद्यांभोवती फिरत राहिलो. निवडणुका आल्यावर पैसा, जेवण आणि दारू एवढे मिळाले म्हणजे युवकांनी ती मोज-मजा वाटते. परंतु ही चुकीची धारण बाजूला ठेवा, समाजाच्या राज्याच्या आणि विशेष करून मराठवाड्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे हे आधी ठरवा. ते ठरवून हे करणे गरजेचे आहे, याच संदेश मला पाठवा, योग्य त्या प्रस्तावांची आपण जरूर दखल घेऊन त्यानुसार संबंधिताला संधी देऊ असे सांगून ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राजकारण करत आहे. आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी मिळते. येथे किती कमी संधी आहेत हे आपण जाणून आहात. मात्र त्याची वस्तुनिष्ठ माहिती दिली जात नसल्याने युवकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, गजानन गीते, खटके आदींसह पानसरे, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.मेळाव्यास जिल्हाभरातून नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.निवडणुका आल्या की, राम मंदिरनिवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवतो. गेली चार वर्षे बहुमताची सत्ता असताना ते का केले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवायची आणि त्याचा लाभ मतपेटीसाठी करून घ्यायचा ही भाजपाची रणनिती असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे