शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:56 IST

महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील गुरूगणेश भवनमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केल. आजपर्यंत आपण केवळ चुकीच्या मुद्यांभोवती फिरत राहिलो. निवडणुका आल्यावर पैसा, जेवण आणि दारू एवढे मिळाले म्हणजे युवकांनी ती मोज-मजा वाटते. परंतु ही चुकीची धारण बाजूला ठेवा, समाजाच्या राज्याच्या आणि विशेष करून मराठवाड्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे हे आधी ठरवा. ते ठरवून हे करणे गरजेचे आहे, याच संदेश मला पाठवा, योग्य त्या प्रस्तावांची आपण जरूर दखल घेऊन त्यानुसार संबंधिताला संधी देऊ असे सांगून ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राजकारण करत आहे. आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी मिळते. येथे किती कमी संधी आहेत हे आपण जाणून आहात. मात्र त्याची वस्तुनिष्ठ माहिती दिली जात नसल्याने युवकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, गजानन गीते, खटके आदींसह पानसरे, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.मेळाव्यास जिल्हाभरातून नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.निवडणुका आल्या की, राम मंदिरनिवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवतो. गेली चार वर्षे बहुमताची सत्ता असताना ते का केले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवायची आणि त्याचा लाभ मतपेटीसाठी करून घ्यायचा ही भाजपाची रणनिती असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे