शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:31 IST

माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.

ठळक मुद्देकैलास गोरंट्याल : समता परिषदेच्या मेळाव्याचे साक्षीदार

जालना : तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथे परिषदेचा पहिला मेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. या घटनेचा मी आणि डॉ. पंडितराज धानुरे हे साक्षीदार आहेत. माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना सावता परिषद आणि समता परिषदेच्या बैठकीत पाठींबा देण्यात आला. गोरंट्याल यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील १७ गावातील सावता आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जालना येथील प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार शकुंतला शर्मा, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत गोरंट्याल यांना विजयी करण्याचा निर्धार केला.बैठकीस नितीन इंगळे, सुभाष गिराम, एकनाथ घोलप, राम गिराम, बबलू बडदे, एकनाथ राऊत, दिलीप गिराम, गणेश खरात, गणेश तिडके, गजानन खरात, अरुण घडलिंग, गोविंद खरात यांच्यासह सावता परिषद, समता परिषदेसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. विशाल धानुरे यांनी केले.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस