शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:46 IST

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ...

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : खाजगी कंपन्यांमुळे सरकारची पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. मराठवाड्यात खूप कमी दूध उत्पादन होते. याकडे संधी म्हणून शेतकºयांनी पाहावे. तुम्हाला मार्केटची चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही दूध उत्पादन वाढवा, मी मुंबईत मार्केट उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारच्या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्या शिरल्याने ती अजूनही शेतकºयांपर्यंत पोहोचलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप व अनुदानित गो-शाळांना गौरवपत्रांचे वितरण महापशुधन एक्स्पोत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही कळत नाही. पण, शेतकºयांचे अश्रू पुसायला हवेत हे निश्चित कळते. एरवी मार्च-एप्रिलमध्ये येणारा दुष्काळ यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच धडकला. या संकट काळात मिळेल तितकी मदत कमीच वाटते. पण, खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अर्जुन खोतकर यांनी सजा वा मजा म्हणून खात्याकडे न बघता खात्याच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.१ लाख दुभती जनावरे वाटणार - खोतकरमहाराष्ट्रातील एकूण दुधापैकी ७३ टक्के दुधाचा पुरवठा प. महाराष्ट्रातून होतो. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा वाटा १७ टक्केच आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आगामी काळात १ लाख जनावरे शेतकºयांना देऊ, अशी घोषणा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. खोतकर म्हणाले, ‘दानवे, पशुसंवर्धन विभाग ही शिक्षाच होती. पण, अधिकारी, कर्मचाºयांनी भारतभ्रमण करून हे प्रदर्शन घडवून आणले.’एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतंमी इस्रायलमध्ये गेलो होतो. तेथे मुद्दाम पशुपालन बघितले. एका वाड्यात हजार जनावरे होती आणि दारात फक्त एक माणूस. मी त्यांना विचारलं किती माणसं जनावरे सांभाळतात, त्यावर ते म्हणाले फक्त एक माणूस. ते मी जाणून घेतले, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली.तिथला माणूस म्हणाला, वाड्याचा दरवाजा उघडल्यावर एक सायरन वाजवला जातो. सर्व जनावरे बाहेर जातात. अडीच फूट गवतात दोन तास चरल्यानंतर पुन्हा सायरन वाजवला जातो. जनावरे पाणी पितात. तिसºया सायरनला जनावरे पुन्हा वाड्यात येतात. आपल्याकडे एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं, असे सांगताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे