शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:46 IST

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ...

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : खाजगी कंपन्यांमुळे सरकारची पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. मराठवाड्यात खूप कमी दूध उत्पादन होते. याकडे संधी म्हणून शेतकºयांनी पाहावे. तुम्हाला मार्केटची चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही दूध उत्पादन वाढवा, मी मुंबईत मार्केट उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारच्या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्या शिरल्याने ती अजूनही शेतकºयांपर्यंत पोहोचलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप व अनुदानित गो-शाळांना गौरवपत्रांचे वितरण महापशुधन एक्स्पोत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही कळत नाही. पण, शेतकºयांचे अश्रू पुसायला हवेत हे निश्चित कळते. एरवी मार्च-एप्रिलमध्ये येणारा दुष्काळ यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच धडकला. या संकट काळात मिळेल तितकी मदत कमीच वाटते. पण, खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अर्जुन खोतकर यांनी सजा वा मजा म्हणून खात्याकडे न बघता खात्याच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.१ लाख दुभती जनावरे वाटणार - खोतकरमहाराष्ट्रातील एकूण दुधापैकी ७३ टक्के दुधाचा पुरवठा प. महाराष्ट्रातून होतो. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा वाटा १७ टक्केच आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आगामी काळात १ लाख जनावरे शेतकºयांना देऊ, अशी घोषणा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. खोतकर म्हणाले, ‘दानवे, पशुसंवर्धन विभाग ही शिक्षाच होती. पण, अधिकारी, कर्मचाºयांनी भारतभ्रमण करून हे प्रदर्शन घडवून आणले.’एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतंमी इस्रायलमध्ये गेलो होतो. तेथे मुद्दाम पशुपालन बघितले. एका वाड्यात हजार जनावरे होती आणि दारात फक्त एक माणूस. मी त्यांना विचारलं किती माणसं जनावरे सांभाळतात, त्यावर ते म्हणाले फक्त एक माणूस. ते मी जाणून घेतले, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली.तिथला माणूस म्हणाला, वाड्याचा दरवाजा उघडल्यावर एक सायरन वाजवला जातो. सर्व जनावरे बाहेर जातात. अडीच फूट गवतात दोन तास चरल्यानंतर पुन्हा सायरन वाजवला जातो. जनावरे पाणी पितात. तिसºया सायरनला जनावरे पुन्हा वाड्यात येतात. आपल्याकडे एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं, असे सांगताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे