शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:46 IST

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ...

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : खाजगी कंपन्यांमुळे सरकारची पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. मराठवाड्यात खूप कमी दूध उत्पादन होते. याकडे संधी म्हणून शेतकºयांनी पाहावे. तुम्हाला मार्केटची चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही दूध उत्पादन वाढवा, मी मुंबईत मार्केट उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारच्या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्या शिरल्याने ती अजूनही शेतकºयांपर्यंत पोहोचलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप व अनुदानित गो-शाळांना गौरवपत्रांचे वितरण महापशुधन एक्स्पोत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही कळत नाही. पण, शेतकºयांचे अश्रू पुसायला हवेत हे निश्चित कळते. एरवी मार्च-एप्रिलमध्ये येणारा दुष्काळ यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच धडकला. या संकट काळात मिळेल तितकी मदत कमीच वाटते. पण, खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अर्जुन खोतकर यांनी सजा वा मजा म्हणून खात्याकडे न बघता खात्याच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.१ लाख दुभती जनावरे वाटणार - खोतकरमहाराष्ट्रातील एकूण दुधापैकी ७३ टक्के दुधाचा पुरवठा प. महाराष्ट्रातून होतो. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा वाटा १७ टक्केच आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आगामी काळात १ लाख जनावरे शेतकºयांना देऊ, अशी घोषणा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. खोतकर म्हणाले, ‘दानवे, पशुसंवर्धन विभाग ही शिक्षाच होती. पण, अधिकारी, कर्मचाºयांनी भारतभ्रमण करून हे प्रदर्शन घडवून आणले.’एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतंमी इस्रायलमध्ये गेलो होतो. तेथे मुद्दाम पशुपालन बघितले. एका वाड्यात हजार जनावरे होती आणि दारात फक्त एक माणूस. मी त्यांना विचारलं किती माणसं जनावरे सांभाळतात, त्यावर ते म्हणाले फक्त एक माणूस. ते मी जाणून घेतले, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली.तिथला माणूस म्हणाला, वाड्याचा दरवाजा उघडल्यावर एक सायरन वाजवला जातो. सर्व जनावरे बाहेर जातात. अडीच फूट गवतात दोन तास चरल्यानंतर पुन्हा सायरन वाजवला जातो. जनावरे पाणी पितात. तिसºया सायरनला जनावरे पुन्हा वाड्यात येतात. आपल्याकडे एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं, असे सांगताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे