शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन एकर शेतात काढले अंजिराचे लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:48 IST

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाजी गोविंद दुरांडे असे या शेतक-याचे नाव आहे.पारंपरिक पीक पद्धतीत शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नसल्याने परिसरातील अनेक शेतकरी हे फळबागांकडे वळले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी मार्ग काढत आहे. धाकलगाव येथील दुरांडे यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दोन एकर शेतात अंजिराची लागवड केली. त्यांनी जवळपास ३०० अंजिराच्या झाडांची लागवड केली. आंतरपीक म्हणून त्यांनी पेरूची २५, फणस ५, ड्रायगन फूड १०, आंबे १०, सीताफळाच्या ११ झाडांची लागवड केली. लागवडीसाठी त्यांना ९० हजार रुपये खर्च आला. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ३२ क्विंटल अंजिराचे उत्पन्न काढले. या अंजिरांना बाजारात १० हजाराचा भाव मिळाला. यातून त्यांना तीन लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले.शेतीतून पाहिजे तसे उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, हवामानातील चढउतार आणि तज्ञांच्या भेटी यातून चांगले उत्पादन सहज शक्य आहे. आज दोन एकरांची त्यांची शेती अनेक शेतक-यांना नवी दिशा आणि नवी प्रेरणा देणारी ठरत आहे. यासाठी त्यांना आई जानकाबाई, भाऊ ज्योतिबा गोविंद दुरांडे, पत्नी आशा, वहिनी सविता, मुले महेश व मुकेश यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दुरांडे यांनी फुलविलेली अंजीर शेती अनेकांच्या दृष्टीने नवा आदर्श ठरत आहे. हे करत असताना त्यांना कृषी सहायक व्ही. एस. कड यांचे मार्गदर्शन घेतले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfruitsफळे