शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ड्रायपोर्टचे काम पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 01:07 IST

ड्रायपोर्टचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना त्यांची उत्पादने थेट परदेशात निर्यात तसेच परदेशातून आयात करण्यासाठी जालन्यातील ड्रायपोर्टचे मोठे योगदान राहणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी जमीन संपादनासह रेल्वे ट्रॅक आणि सुरक्षाभिंत उभारणीवर जवळपास २०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. आणखी १७० कोटी रूपयांची गरज असून, या प्रकल्पाचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा आमचा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.संजय सेठी यांच्यासह जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस.व्ही. मदाभावी, सहायक प्रबंधक आर.बी. जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी यांनी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी सेठी यांनी दानवे यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. २०१५ मध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास तत्कालीन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता. हा प्रकल्प जालन्यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा मंत्री झालेल्या जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात खेचून आणला होता.यासाठी दरेगाव, खादगाव या शिवारातील जवळपास ५०० एकर जागा संपादित केली गेली. गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाच्या ५०० एकर जागेला सुरक्षा भिंत बांधून पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मालाची ने-आण रेल्वेने करणे सोयीचे व्हावे यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानक आणि ड्रायपोर्टच्या जवळपास तीन किलोमीटर परिसरात स्वतंत्र रेल्वे ट्रॅक जेएनपीटीने बांधला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सेठी यांनी दानवे यांना दिली.दरम्यान, आजचा हा आपला दौरा प्रत्यक्ष पाहणी करून नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी असल्याचे सेठींनी सांगितले. यावेळी येथे खाजगी उद्योगांकडूनही छोटे-मोठे उद्योग उभारण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येऊन परिसर विकसित केला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जेएनपीटीचे येथील संचालक विवेक देशपांडे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात सर्वात प्रमुख मुद्दा असलेल्या कस्टम क्लिअरंन्स मुद्दा निकाली काढण्यात आला. त्यामुळे आता जालन्यातूनच माल निर्यात करण्याच्या सर्व त्या तांत्रिक बाबी पूर्ण होणार असून, येथून निर्यात करण्यासाठी ज्या देशात तो माला पाठवायचा आहे. ते तो जाण्यासाठी जेएनपीटीतून थेट बोटीत चढविता येणार आहे. यामुळे मोठा वेळ आणि खर्च वाचणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक सतीश अग्रवाल, अर्जुन गेही आदींची उपस्थिती होती.इंधन बचत : पर्यावरणास लाभमुंबई पर्यंत जाण्यासाठी रस्ते वाहतुकीचा वेळ तसेच जेएनपीटीत माल पोहोचल्यावर थेट पूर्वी कस्टम ड्युटीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीचा वेळ खर्ची होणार नाही.यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होऊन पर्यावरणासाठी यामुळे मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी दरेगाव, खादगाव येथे भेट देऊन पाहणी केली. औरंगाबादेतील बैठकीत उद्योजक डी.बी. सोनी, रितेश मिश्रा, घनश्याम गोयल, गोविंद गोयल, अनुज अग्रवाल, मुकुंद मंत्री यांची उपस्थिती होती.

टॅग्स :MIDCएमआयडीसीraosaheb danveरावसाहेब दानवेroad transportरस्ते वाहतूकrailwayरेल्वे