शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

सहा महिन्यांत ड्रायपोर्टचे काम पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 01:07 IST

ड्रायपोर्टचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना त्यांची उत्पादने थेट परदेशात निर्यात तसेच परदेशातून आयात करण्यासाठी जालन्यातील ड्रायपोर्टचे मोठे योगदान राहणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी जमीन संपादनासह रेल्वे ट्रॅक आणि सुरक्षाभिंत उभारणीवर जवळपास २०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. आणखी १७० कोटी रूपयांची गरज असून, या प्रकल्पाचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा आमचा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.संजय सेठी यांच्यासह जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस.व्ही. मदाभावी, सहायक प्रबंधक आर.बी. जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी यांनी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी सेठी यांनी दानवे यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. २०१५ मध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास तत्कालीन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता. हा प्रकल्प जालन्यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा मंत्री झालेल्या जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात खेचून आणला होता.यासाठी दरेगाव, खादगाव या शिवारातील जवळपास ५०० एकर जागा संपादित केली गेली. गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाच्या ५०० एकर जागेला सुरक्षा भिंत बांधून पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मालाची ने-आण रेल्वेने करणे सोयीचे व्हावे यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानक आणि ड्रायपोर्टच्या जवळपास तीन किलोमीटर परिसरात स्वतंत्र रेल्वे ट्रॅक जेएनपीटीने बांधला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सेठी यांनी दानवे यांना दिली.दरम्यान, आजचा हा आपला दौरा प्रत्यक्ष पाहणी करून नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी असल्याचे सेठींनी सांगितले. यावेळी येथे खाजगी उद्योगांकडूनही छोटे-मोठे उद्योग उभारण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येऊन परिसर विकसित केला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जेएनपीटीचे येथील संचालक विवेक देशपांडे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात सर्वात प्रमुख मुद्दा असलेल्या कस्टम क्लिअरंन्स मुद्दा निकाली काढण्यात आला. त्यामुळे आता जालन्यातूनच माल निर्यात करण्याच्या सर्व त्या तांत्रिक बाबी पूर्ण होणार असून, येथून निर्यात करण्यासाठी ज्या देशात तो माला पाठवायचा आहे. ते तो जाण्यासाठी जेएनपीटीतून थेट बोटीत चढविता येणार आहे. यामुळे मोठा वेळ आणि खर्च वाचणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक सतीश अग्रवाल, अर्जुन गेही आदींची उपस्थिती होती.इंधन बचत : पर्यावरणास लाभमुंबई पर्यंत जाण्यासाठी रस्ते वाहतुकीचा वेळ तसेच जेएनपीटीत माल पोहोचल्यावर थेट पूर्वी कस्टम ड्युटीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीचा वेळ खर्ची होणार नाही.यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होऊन पर्यावरणासाठी यामुळे मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी दरेगाव, खादगाव येथे भेट देऊन पाहणी केली. औरंगाबादेतील बैठकीत उद्योजक डी.बी. सोनी, रितेश मिश्रा, घनश्याम गोयल, गोविंद गोयल, अनुज अग्रवाल, मुकुंद मंत्री यांची उपस्थिती होती.

टॅग्स :MIDCएमआयडीसीraosaheb danveरावसाहेब दानवेroad transportरस्ते वाहतूकrailwayरेल्वे